पुरुष्या, तुझ्यासोबत बुद्धीबळ खेळून खूप वर्ष झाली. सत्तेच्या पटावर तू आता वजीर झालायस, आठही दिशांना बेफाम उधळतोयस ! मला माहित आहे याइतके सामर्थ्य तू कधीही अनुभवले नव्हतेस. काही क्षणांसाठी तुला एकावेळी एक घर चालणारा राजा पण कमजोर, तुझ्या पायातली बेडी वाटू लागला असेल. हो ना?
पण पुरुष्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, पटावर खेळ तोवरच चालतो जोवर राजा जिवंत आहे. आणि राजाला जिवंत ठेवण्यासाठी कुणाचाही बळी दिला जाऊ शकतो, प्रसंगी स्वतःच्या सामर्थ्यशाली वजीराचा सुद्धा !
काय म्हणालास? वजीराशिवाय राजसत्ता कशी टिकेल? प्रमोशन पुरुष्या प्रमोशन!
वजीर भरात असताना सुद्धा राजा काही प्यादी आठव्या घराकडे नेत असतो. कधी कधी
शत्रूचे एखादे प्यादे सुद्धा राजसत्तेला आणि वजीराला एकत्र शह देते, आणि
मग वेळ येते राजसत्तेला वाचवायची. तेव्हा वजीराचा बळी दिला जातो आणि तिकडे
आठव्या घरात प्यादे नेऊन त्याला नवा वजीर म्हणून पटावर आणायचं!
राजसत्ता स्वयंभू असते आणि ती कुठल्याही प्याद्याला वजीर बनवायची ताकद ठेवून असते. तेव्हा पुरुष्या, सांभाळून रहा आणि राजसत्तेला, तिच्या लाडक्या प्याद्यांना अप्रत्यक्ष आव्हान देताना सुद्धा दोनदा विचार करत जा!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १० ऑगस्ट २०१६, २०.०७ )
राजसत्ता स्वयंभू असते आणि ती कुठल्याही प्याद्याला वजीर बनवायची ताकद ठेवून असते. तेव्हा पुरुष्या, सांभाळून रहा आणि राजसत्तेला, तिच्या लाडक्या प्याद्यांना अप्रत्यक्ष आव्हान देताना सुद्धा दोनदा विचार करत जा!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १० ऑगस्ट २०१६, २०.०७ )
No comments:
Post a Comment