मेडिकल कॉलेज मध्ये असताना आम्ही 4 मित्र पावसाळ्यात कोयनानगरला गेले होतो. दिवसभर कोसळत्या पावसात आणि नवजा येथील धबधब्यांमध्ये भिजून चिंब झालेलो. परतीच्या बस मध्ये चढलो तर सगळ्या window seat वर कुणी ना कुणी बसलेलं. मला आणि माझा मित्र प्रतापला एकत्र बसायच होतं पण सगळ्या सीट वर एक अशा रिकाम्या जागा. शेवटी तो आणि मी वेगवेगळ्या सीट वर बसलो.
माझ्या शेजारी साठीतले एक सफारी घातलेले नीटनेटके गृहस्थ बसलेले होते. त्यांना प्रताप सोबत सीट अदलाबदल करण्याची विनंती थोडक्यात धुडकवली जाणार होती कारण खिडकीतून दिसणारा नयनरम्य देखावा साऱ्यांना हवा असतो. गाडी सुरु झाली आणि डोक्यात ट्यूब पेटली. मी दोन्ही हातांच्या बोटांच्या बेचक्यात खाजवायला सुरुवात केली आणि हळूच शेजारच्या गृहस्थांना साळसूदपणे विचारले, "काका, त्या नवजाच्या धबधब्यात आंघोळ केल्यावर खरूज जाते ना?"
पुढील 2 मिनिटांत काकांनी तिथून दुसरीकडे पोबारा केला होता आणि मी window
seat वर सरकलो होतो. प्रताप माझ्या शेजारी आला होता आणि मिरजेला येईपर्यंत
आम्ही फक्त हसत होतो.
- फेसबुक पोस्ट ( २ जून २०१६, २०.०२ )
- फेसबुक पोस्ट ( २ जून २०१६, २०.०२ )
No comments:
Post a Comment