Wednesday, December 28, 2016

निरोप


आज सकाळी स्वाती आणि कबीर लातूरला गेले. त्यांना सोडवायला जाणे म्हणजे भावनिक क्षण असतो माझ्यासाठी. रात्रंदिवस माझ्या अंगाला ढूसण्या देत, दंगामस्ती करत घर दुमदुमून सोडणारा आणि कधी कधी अक्षरश: वैताग देणारा कबीर तेव्हा अचानक जास्तच हवाहवासा वाटायला लागतो. दिवसभर शांततेत काम करत, अबोल स्वभावामुळे जवळपास असून पण न जाणवणारी स्वाती, तिच्या येणाऱ्या अनुपस्थितीची जाणीव तेव्हा अत्यंत प्रकर्षाने करून देते.

घरात पडलेली कबीरची खेळणी, त्याने भिंतीवर मारलेल्या रेषा, त्याचा झोका, पाळणा आणि या सर्वांच्या मध्ये जाणवणारे स्वाती आणि कबीरचे अस्तित्व मला त्या रिकाम्या घरात अजून जास्त एकाकी पाडते. घर हे भिंती आणि वस्तूंपेक्षा त्यातल्या माणसांनी बनते हे शिकवायला यापेक्षा मोठा दृष्टांत मला तरी लागत नाही. स्वाती-कबीर असताना एक छोटासा कोपरा धरून राहणारा श्रीमंत मी, ते गेल्यावर अख्खा ३bhk एकट्यासाठी असताना पण एकदम भिकारी बनून जातो.

- फेसबुक पोस्ट ( २६ मे २०१६, १३.०० )

No comments:

Post a Comment