बिल गेट्स असो की बाळू गोटे.. दोघांच्याही आयुष्यात एक गोष्ट समान
असते.. प्रत्येक दिवसाचे तास किंवा आयुष्यात मिळणारा स्वतः साठीचा वेळ.
गरीब असो, श्रीमंत असो, तरुण असो की वृद्ध... सगळ्यांच्या दिवसात 24 तास
आणि प्रत्येक तासात 3600 सेकंद. कितीही पैसे दिले तरी दिवसातले तास वाढवून
मिळत नाहीत की आयुष्यात स्वतःला द्यायचा वेळ परत मिळत नाही.
भविष्यात अमाप पैसा कमावण्यासाठी वर्तमानात तहान-भूक हरपून, प्रेम आणि आनंदाचे क्षण अव्हेरून, स्वतःच्या शरीराला झिजवणारी आणि फक्त काम एके काम हे आयुष्य जगणारी माणसे ही कदाचित अमाप श्रीमंत, प्रसिद्ध होतील पण सुखी-समाधानी नाही. Work-Life balance सारखी महत्वाची गोष्ट आयुष्यात काहीही नाही. जेव्हा हा balance जातो तेव्हा माणसे ना professional life मध्ये यशस्वी होतात, ना personal life मध्ये.
आपल्या आयुष्यात असणारी माणसे, नातेसंबंध, प्रेम, जिव्हाळा, विरंगुळ्याचे क्षण, आवडी-निवडी, जोपासलेले छंद, प्रवास, खळखळून हसून मित्रांसमवेत घालवलेले क्षण यांची बरोबरी कुठलाही पैसा, प्रसिद्धी किंवा व्यावसायिक यश करू शकत नाही. या जगात कुणालाही आपला भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्यावर पूर्ण ताबा मिळवता येत नाही... फक्त एकच गोष्ट हातात असते ती असते वर्तमान आणि त्या वर्तमानात माणूस स्वतःसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी जो आनंदाचे क्षण निर्माण करू शकतो, फक्त तीच खरी संपत्ती असते.
स्वतःच्या आयुष्यात तुम्ही कुणालाही सगळ्यात मोठी भेट जी देऊ शकता ती असते स्वतःचा वेळ ... आणि सगळ्यात चांगली भेट असते आनंदाचे काही क्षण. ज्यांना हे अजूनही कळत नाही त्यांनी एकदा हृषीकेश मुखर्जींचा 'आनंद' किंवा इम्तियाज अली चा 'Jab We Met' महिन्यातून एकदा न विसरता पाहावा. किंवा देव साहेबांवर चित्रित झालेले एक सदाबहार गाणे दिवसातून एकदा तरी ऐकावे ... "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुयें में उडाता चला गया।"
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २१ ऑक्टोबर २०१६, १९.१२ )
भविष्यात अमाप पैसा कमावण्यासाठी वर्तमानात तहान-भूक हरपून, प्रेम आणि आनंदाचे क्षण अव्हेरून, स्वतःच्या शरीराला झिजवणारी आणि फक्त काम एके काम हे आयुष्य जगणारी माणसे ही कदाचित अमाप श्रीमंत, प्रसिद्ध होतील पण सुखी-समाधानी नाही. Work-Life balance सारखी महत्वाची गोष्ट आयुष्यात काहीही नाही. जेव्हा हा balance जातो तेव्हा माणसे ना professional life मध्ये यशस्वी होतात, ना personal life मध्ये.
आपल्या आयुष्यात असणारी माणसे, नातेसंबंध, प्रेम, जिव्हाळा, विरंगुळ्याचे क्षण, आवडी-निवडी, जोपासलेले छंद, प्रवास, खळखळून हसून मित्रांसमवेत घालवलेले क्षण यांची बरोबरी कुठलाही पैसा, प्रसिद्धी किंवा व्यावसायिक यश करू शकत नाही. या जगात कुणालाही आपला भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्यावर पूर्ण ताबा मिळवता येत नाही... फक्त एकच गोष्ट हातात असते ती असते वर्तमान आणि त्या वर्तमानात माणूस स्वतःसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी जो आनंदाचे क्षण निर्माण करू शकतो, फक्त तीच खरी संपत्ती असते.
स्वतःच्या आयुष्यात तुम्ही कुणालाही सगळ्यात मोठी भेट जी देऊ शकता ती असते स्वतःचा वेळ ... आणि सगळ्यात चांगली भेट असते आनंदाचे काही क्षण. ज्यांना हे अजूनही कळत नाही त्यांनी एकदा हृषीकेश मुखर्जींचा 'आनंद' किंवा इम्तियाज अली चा 'Jab We Met' महिन्यातून एकदा न विसरता पाहावा. किंवा देव साहेबांवर चित्रित झालेले एक सदाबहार गाणे दिवसातून एकदा तरी ऐकावे ... "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुयें में उडाता चला गया।"
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २१ ऑक्टोबर २०१६, १९.१२ )
No comments:
Post a Comment