साधारण 25 वर्षांपूर्वी, बाबरी मशीद दंगलींच्या काळात एका महाराष्ट्रीय हिंदुत्ववादी पक्षाने मेळावा घेतला होता, ज्याच्या वर्तमानातल्या जाहिराती साधारण असे बोलत होत्या ... "ज्यांचे रक्त शुद्ध आहे अशा हिंदूंनी विराट संख्येने उपस्थित रहावे!"
पंढरपूर कॉलेजला तेव्हा प्रा.पानवळ नावाचे स्पष्टवक्ते, इतिहासाचे विद्वान प्राचार्य होते. त्यांनी त्या जाहिरातीवर मार्मिक टिपण्णी केली होती ती साधारण अशी...
"या देशात ग्रीक आले,
रोमन आले, शक आले, हुन आले, अरब आले, तुर्क आले, तुघलक आले, खिलजी आले,
मुघल आले, अफगाण आले, पठाण आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, डच
आले .... आपआपली तलफ भागवून गेले आणि तरीसुद्धा आम्ही शुद्ध रक्ताचे !!!"
- फेसबुक पोस्ट ( ०८ ऑगस्ट २०१६, १७.०६ )
- फेसबुक पोस्ट ( ०८ ऑगस्ट २०१६, १७.०६ )
No comments:
Post a Comment