फडणवीस सरकार इतके निर्विवाद नालायक सरकार महाराष्ट्रात प्रथमच आलेले आहे.
मागे हे अध्यादेश काढायला निघाले होते की, जर कुणी सरकारच्या विरोधात टीका केली तर तो राष्ट्रद्रोह असेल. जनमताच्या रेट्यापुढे आणि अभिव्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे हनन होतेय म्हणून माध्यमांनी टीका केल्यावर नांगी टाकत त्यांनी तो प्रकार थांबवला.
नंतर गोहत्येची अस्तित्वात असलेली बंदी वाढवून 'गोवंश हत्या बंदी' केली. महाराष्ट्रातला चर्मोद्योग यांनी मातीत घातला, अगदी इथल्या प्रसिद्ध कोल्हापुरी चपला सुद्धा आता बाजारात मिळेना झाल्यात. आणि जेव्हा स्वतः पंतप्रधान गोरक्षकांचे कान उपटत होते तेव्हा महाराष्ट्र सरकार अधिकृत गोरक्षक नेमत होते आणि आहे. थोडक्यात आहार आणि व्यवसाय निवडीचे मूलभूत स्वातंत्र्य यांनी पायदळी तुडवले.
मागे हे अध्यादेश काढायला निघाले होते की, जर कुणी सरकारच्या विरोधात टीका केली तर तो राष्ट्रद्रोह असेल. जनमताच्या रेट्यापुढे आणि अभिव्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे हनन होतेय म्हणून माध्यमांनी टीका केल्यावर नांगी टाकत त्यांनी तो प्रकार थांबवला.
नंतर गोहत्येची अस्तित्वात असलेली बंदी वाढवून 'गोवंश हत्या बंदी' केली. महाराष्ट्रातला चर्मोद्योग यांनी मातीत घातला, अगदी इथल्या प्रसिद्ध कोल्हापुरी चपला सुद्धा आता बाजारात मिळेना झाल्यात. आणि जेव्हा स्वतः पंतप्रधान गोरक्षकांचे कान उपटत होते तेव्हा महाराष्ट्र सरकार अधिकृत गोरक्षक नेमत होते आणि आहे. थोडक्यात आहार आणि व्यवसाय निवडीचे मूलभूत स्वातंत्र्य यांनी पायदळी तुडवले.
आज एक पाऊल पूढे जात कुठल्याही कारणासाठी 100 पेक्षा जास्त लोक जमा होणार
असतील तर आधी परवानगी घ्यावी लागेल असा कायदा बनवायला चाललेय. थोडक्यात
कार्यक्रम खासगी असो, राजकीय किंवा सामाजिक.... लोकांच्या हालचालीवर
सरकारचे निर्बंध आणि नजर. घटनेने लोकांना हालचालींचे मूलभूत हक्क दिलेले
आहेत आणि या मूलभूत हक्का ला फडणवीस सरकार पायदळी तुडवायला चाललेय.
प्रत्येक वेळेस नागरिकांचा घटनेने दिलेला एकेक मूलभूत हक्क काढून घ्यायला हे सरकार इतके आतुर का आहे??? आणि कारण काय तर म्हणे आंतरिक सुरक्षा??? कसली बोडक्याची आंतरिक सुरक्षा धोक्यात आलीय महाराष्ट्रात जी 100 लोक मिळवून बिघडवतील ?? एवढीच आंतरिक सुरक्षेची काळजी असेल तर आधी दाभोळकर आणि पानसरेंचे खुनी पकडून दाखवा ना!! थांबवा ना कोपर्डी, खर्डा सारखे नृशंस अत्याचार !!
फडणवीस साहेब, स्वतःच्या नाकर्तेपणाला लपवण्यासाठी, त्याच्या विरोधात असलेला जनक्षोभ लपवण्यासाठी किती हक्क माराल लोकांचे?? काही काम कराल कि फक्त हे खाऊ नका, हे बोलू नका, इथे भेटू नका, तिथे जाऊ नका यातच आपली अर्धवट अक्कल लावत बसणार?? विदर्भातून निवडून येऊन, तिथल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून थांबवण्यासाठी काही काम केलंय का 2 वर्षात? जरा विधायक कामे करा सरकार म्हणून ज्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय!!!
- फेसबुक पोस्ट ( २४ ऑगस्ट २०१६, १६.०७ )
प्रत्येक वेळेस नागरिकांचा घटनेने दिलेला एकेक मूलभूत हक्क काढून घ्यायला हे सरकार इतके आतुर का आहे??? आणि कारण काय तर म्हणे आंतरिक सुरक्षा??? कसली बोडक्याची आंतरिक सुरक्षा धोक्यात आलीय महाराष्ट्रात जी 100 लोक मिळवून बिघडवतील ?? एवढीच आंतरिक सुरक्षेची काळजी असेल तर आधी दाभोळकर आणि पानसरेंचे खुनी पकडून दाखवा ना!! थांबवा ना कोपर्डी, खर्डा सारखे नृशंस अत्याचार !!
फडणवीस साहेब, स्वतःच्या नाकर्तेपणाला लपवण्यासाठी, त्याच्या विरोधात असलेला जनक्षोभ लपवण्यासाठी किती हक्क माराल लोकांचे?? काही काम कराल कि फक्त हे खाऊ नका, हे बोलू नका, इथे भेटू नका, तिथे जाऊ नका यातच आपली अर्धवट अक्कल लावत बसणार?? विदर्भातून निवडून येऊन, तिथल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून थांबवण्यासाठी काही काम केलंय का 2 वर्षात? जरा विधायक कामे करा सरकार म्हणून ज्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय!!!
- फेसबुक पोस्ट ( २४ ऑगस्ट २०१६, १६.०७ )
No comments:
Post a Comment