तुम्हाला कधी लग्नानंतर कुणावर प्रेम झालंय? जर झाले असेल तर स्वतःच्या पाठीवर एक कौतुकाची थाप ठोकून घ्या. का टाकायची ते शेवटी सांगेन. माझी रात्रीची जास्त झालीय वगैरे असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही नाहीये.
प्रेम आणि लग्न या दोन पूर्णतः वेगळ्या संकल्पना आहेत. प्रेम जीवनाच्या उत्पत्तीपासून अस्तिवात आहे अगदी करोडो वर्षापासून, तर विवाहसंस्था ही गेल्या 4-5 हजार वर्षातली एक सामाजिक व्यवस्था आहे. प्रेम biological आहे आणि त्यात खूप सारे प्रकार-प्रवाह, खूप साऱ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेमाची परिभाषा बदलत राहते. लग्न हि एक social संकल्पना आहे, एकास एक प्रमाणात जन्माला येणाऱ्या स्त्री-पुरुषांना जोडी बनवून equal distribution देणारी, जेणेकरून कुणी एकट राहून सामाजिक व्यवस्था उलथू नयेत. प्रेम सार्वत्रिक आहे तर लग्नाच्या संकल्पना प्रत्येक समाजात वेगळ्या आहेत. आणि म्हणूनच biology ही sociology ला नेहमी वरचढ असते.
लग्नानंतर मला कुणावर प्रेम झालं तर ती माझ्या नवऱ्याशी किंवा बायकोशी
प्रतारणा होईल हे मनात घट्ट पकडून आम्ही ते प्रेम कधी मान्यच करत नाही.
लग्नाआधी तुम्हाला कुणाचं सौंदर्य, विद्वत्ता, स्वभाव, ऐश्वर्य किंवा इतर
काही गोष्टी (attributes म्हणू एकत्रितपणे) आवडून तुम्ही प्रेमात पडता,
कारण तुमचा मेंदू त्यासाठी तुम्हाला भाग पाडतो. लग्न करताना तुमच्या साऱ्या
attributes वर कुणीही 100% पूर्ण खरं उतरणे अशक्य आहे. म्हणून मग
त्यातल्या त्यात महत्वाचे attributes पुरेसे होतायत हे पाहुन, मोलतोल करत
आम्ही लग्न करतो. परिपूर्ण नवरा किंवा बायको हि अशक्य गोष्ट आहे कारण हे
सारे attributes चल आहेत, सतत बदलणारे आहेत.
सात फेरे घेऊन किंवा 'कबूल हैं' म्हणून तुमचा मेंदू बदलत नाही. तुमच्या आवडीचे attributes तुम्ही लग्नानंतरही शोधात राहता कारण मेंदू ते करणे जिवंतपणी थांबवू शकतच नाही. त्यातल्या त्यात तुमच्या partner मध्ये जे attributes तुमच्या अपेक्षेनुरूप मिळाले नाहीत, ते जर दुसऱ्या कुणात दिसले तर तुम्ही त्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याला थांबवू शकत नाही. तुम्हाला त्या व्यक्तीच्या सानिध्यात अपूर्ण राहिलेले attributes पूर्ण करून घेऊ वाटतात. पण मग तेव्हा लग्नाची बेडी आठवते. मग तुम्ही एकतर त्या प्रेमाला पूर्ण नाकारता कि आता वेळ चुकीची आहे म्हणून, किंवा मैत्रीचं गोंडस नाव देऊन त्यामागे लपत त्या सुप्त अतृप्ती पूर्ण करून घेता.
लग्नानंतर पण कुणाबद्दल प्रेम वाटण्यात प्रतारणा नाहीये कुणाशी, ना ही कुणा दोन लोकांमधली तुलना आहे कारण दोन्ही आवडत्या व्यक्तींचे attributes बऱ्याचदा पूर्ण वेगळे असतात जिथे तुलना करताच येत नाही. खूप कमी लोकांमध्ये एवढा प्रामाणिकपणा असतो कि आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या व्यक्तींकडे खेचणारे प्रेम ते मान्य करतात. त्याहून पण जास्त धैर्य लागते ते आपल्या जोडीदारापुढे हे सुप्त प्रेम कबुल करायला. आणि सगळ्यात जास्त समजूतदारपणा लागतो आपल्या जोडीदाराच हे सुप्त प्रेम मान्य करायला. म्हणून तुम्ही जर कधी हे प्रेम मान्य केलं असेल तर तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम. आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराचे हे सुप्त प्रेम मान्य केलं असेल तर तुम्हाला साष्टांग दंडवत!
गालिब उगीच म्हणत नाही -
"कहते है जिसको इश्क,
खलल है दिमाग का"
- फेसबुक पोस्ट ( १ जून २०१६, ०८.३४ )
सात फेरे घेऊन किंवा 'कबूल हैं' म्हणून तुमचा मेंदू बदलत नाही. तुमच्या आवडीचे attributes तुम्ही लग्नानंतरही शोधात राहता कारण मेंदू ते करणे जिवंतपणी थांबवू शकतच नाही. त्यातल्या त्यात तुमच्या partner मध्ये जे attributes तुमच्या अपेक्षेनुरूप मिळाले नाहीत, ते जर दुसऱ्या कुणात दिसले तर तुम्ही त्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याला थांबवू शकत नाही. तुम्हाला त्या व्यक्तीच्या सानिध्यात अपूर्ण राहिलेले attributes पूर्ण करून घेऊ वाटतात. पण मग तेव्हा लग्नाची बेडी आठवते. मग तुम्ही एकतर त्या प्रेमाला पूर्ण नाकारता कि आता वेळ चुकीची आहे म्हणून, किंवा मैत्रीचं गोंडस नाव देऊन त्यामागे लपत त्या सुप्त अतृप्ती पूर्ण करून घेता.
लग्नानंतर पण कुणाबद्दल प्रेम वाटण्यात प्रतारणा नाहीये कुणाशी, ना ही कुणा दोन लोकांमधली तुलना आहे कारण दोन्ही आवडत्या व्यक्तींचे attributes बऱ्याचदा पूर्ण वेगळे असतात जिथे तुलना करताच येत नाही. खूप कमी लोकांमध्ये एवढा प्रामाणिकपणा असतो कि आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या व्यक्तींकडे खेचणारे प्रेम ते मान्य करतात. त्याहून पण जास्त धैर्य लागते ते आपल्या जोडीदारापुढे हे सुप्त प्रेम कबुल करायला. आणि सगळ्यात जास्त समजूतदारपणा लागतो आपल्या जोडीदाराच हे सुप्त प्रेम मान्य करायला. म्हणून तुम्ही जर कधी हे प्रेम मान्य केलं असेल तर तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम. आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराचे हे सुप्त प्रेम मान्य केलं असेल तर तुम्हाला साष्टांग दंडवत!
गालिब उगीच म्हणत नाही -
"कहते है जिसको इश्क,
खलल है दिमाग का"
- फेसबुक पोस्ट ( १ जून २०१६, ०८.३४ )
No comments:
Post a Comment