Thursday, December 29, 2016

आमच्या काळात असलं नव्हतं

स्वतःच्या मुला-मुलींच्या संसारात जुन्या पिढीचे पोथीवादी संस्कार उगीच घुसडत त्यांना सुखाने जगू न देणारे आईबाप आणि सासू-सासरे पण तेवढेच मूर्ख आणि अडेलतट्टू आहेत जेवढ्या निर्बुद्ध जातपंचायती आहेत!
"आमच्या काळात असलं नव्हतं !" हे सांगायला तुमचा काळ राहिलायचं कुठे??

काळ बदललाय, जग बदललंय, पिढी बदललीय आणि तुम्ही ज्याला बंधन घालून स्वतःचे उपद्रवमूल्य सिद्ध करताय तो संसार पण तुमचा नाहीये. तेव्हा सुखा समाधानाने आपल्या मुला-नातवंडांच्या आनंदात आनंद माना. स्वतःच्या आनंदासाठी त्यांना त्रास देत बसू नका.

- फेसबुक पोस्ट ( ३ जून २०१६, १७.३३ )

No comments:

Post a Comment