(माझे गुरु आणि मोठे भाऊ जोशी सरांनी सांगितलेली UP मधली एक आठवण)
भर उन्हाळ्याचे दिवस होते. सर, आई आणि बाबा हे तिघे मथुरेत पर्यटनासाठी गेले होते. भर ऊन्हात चालून चालून सर्वांना तहान लागली होती. आजूबाजूला फक्त घरे होती, पाण्याची इतर कुठलीही सोय दिसेना. तेव्हा एका घरात जाऊन सरांनी पाणी मागितले.
घरातल्या
रहिवाशांनी पाहिल्या प्रथम जात विचारली, कारण अस्पृश्यांना पाणी द्यायचे
नव्हते त्यांना. यांनी सांगितले की ब्राम्हण आहोत. त्यावर लगेच त्या
घरमालकाने सांगितले की ब्राम्हण असाल तर जानवे दाखवा. सर आणि बाबा दोघेही
रूढींना फाटा देणारे त्यामुळे दोघांच्याही अंगावर जानवे नव्हते.
आता आली पंचाईत? पण तरीही त्या घरमालकाने यांचा वेष, बोली पाहून थोडे औदार्य दाखवले. आणि संडास/बाथरूम मध्ये वापरल्या गेलेल्या एका घाणेरड्या मग मध्ये पाणी आणून वरून ओंजळीत ओतले. दुसरा कुठलाही पर्याय आजूबाजूला दिसत नसल्याने त्या तिघांनी अपरिहार्यता म्हणून ते पाणी पिले.
हा किस्सा सांगताना सुद्धा सर पोटतिडकीच्या संतापाने सांगत होते. आणि आधीच रूढी परंपराना फाटा देणारे सर यानंतर आणखीनच त्यांच्या विरोधात गेले.
सर मला एक गोष्ट नेहमी सांगतात "कुणाच्या घरात जन्म घ्यावा हे माणसाच्या हातात नसते. म्हणून जन्माला आधार मानून कुणालाही विनाकारण जवळ करू नये किंवा तिरस्कार करू नये." यापेक्षा सोपी व्याख्या काय असू शकते मानवतेची!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ०३ ऑगस्ट २०१६, २०.११ )
आता आली पंचाईत? पण तरीही त्या घरमालकाने यांचा वेष, बोली पाहून थोडे औदार्य दाखवले. आणि संडास/बाथरूम मध्ये वापरल्या गेलेल्या एका घाणेरड्या मग मध्ये पाणी आणून वरून ओंजळीत ओतले. दुसरा कुठलाही पर्याय आजूबाजूला दिसत नसल्याने त्या तिघांनी अपरिहार्यता म्हणून ते पाणी पिले.
हा किस्सा सांगताना सुद्धा सर पोटतिडकीच्या संतापाने सांगत होते. आणि आधीच रूढी परंपराना फाटा देणारे सर यानंतर आणखीनच त्यांच्या विरोधात गेले.
सर मला एक गोष्ट नेहमी सांगतात "कुणाच्या घरात जन्म घ्यावा हे माणसाच्या हातात नसते. म्हणून जन्माला आधार मानून कुणालाही विनाकारण जवळ करू नये किंवा तिरस्कार करू नये." यापेक्षा सोपी व्याख्या काय असू शकते मानवतेची!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ०३ ऑगस्ट २०१६, २०.११ )
No comments:
Post a Comment