Friday, December 30, 2016

काश्मीर

मी कश्मीर, ईशान्य भारतातील AFSPA चा दुरूपयोग करुन सैन्याने निष्पाप लोकांवरचे केलेले अत्याचार किंवा छत्तीसगड मधील आदिवासींचे हत्याकांड, बलात्कार यावर लिहिल आणि नेहमीचे खालील काही प्रातिनिधिक आक्षेप आले, आणि त्याच्यावर माझे उत्तर -

1. AC त बसून बोलायला काय जातय? तिथे जावून बोला.

- का बाबा? तुमच्या घरातले AC काढून, सोफे फेकून देवून कुठल्या काटेरी आसनावर आपला पार्श्वभाग ठेवून तुम्ही हे कमेंट लिहिता? तुमची आई का बाप कश्मीरी की तुम्ही एवढे अधिकारवाणीने माझा बोलायचा हक्क नाकरता?
तुम्ही ISIS विरुद्ध, France मधल्या हल्ल्यांवर लिहिता तेव्हा तुमचा आजा का पणजा ईराक मध्ये जन्मला होता की फ्रेंच राज्यक्रांति मधे लढला होता ?
चंद्रावर खड्डे आहेत हे काय चंद्रावर जावून येवून सांगताय का?

2. कश्मीर मध्ये पुर आला तेव्हा हे तितर खात होते.

- हो, खाल्ले तितर, गाय, डुक्कर आणि बोकड. स्वत:च्या पैशाने खाल्ले.
भारतात रोज कुठे न कुठे नैसर्गिक आपत्ति, अपघात होतात... तेव्हा तुम्ही काय 365 दिवस सूतक पाळून असता का? का वर्षभर उपाशीच असता ? रात्री बायकोसोबत झोपता की सीमेवरच्या सैनिकांना सोबत म्हणून जागे असता?
आणि काही काम धंदा वगैरे करता की वर्ष भर आपत्तिनिवारण करत भारतभर फिरता? दिसत तर नाही तुम्ही कुठे ते काम करताना!

3. निष्पाप नागरिक .. गुड़ जोक.

- कुठल्या गाढवाने तुम्हाला सांगितलं कि सगळे काश्मिरी अपराधी आहेत? लहान लहान बाळांवर चालवलेले छर्रे, त्यांचे गेलेले डोळे तुम्हाला दिसत नाहीत का?

4. छत्तीसगड मधले अत्याचार - सोनी सोरी, हिडमे इत्यादी

- यावर एकाही राष्ट्रप्रेमीची लिहायची हिम्मत झालीच नाही. सोनी सोरी च्या गुप्तांगात खडे भरले, तिचे तोंड ऍसिडने जाळले. हिडमेच्या गुप्तांगात सुरी खुपसून तिचे पोट फाडले. आणि अशा शेकडो आदिवासी स्त्रिया आहेत ज्यांची हि फरफट राष्ट्रवादी आंधळ्याना दिसणारच नाही.
तुमच्या पार्श्वभागात दम असेल तर करून दाखवा निषेध सोनी सोरी आणि हिडमेवर अत्याचार करणाऱ्या सशस्त्र बलांचा. ती तरी काश्मिरी नाहीये ना?

5. काश्मीर शांत असले तर सैन्य असेलच कशाला तिथे? त्यांनी शांत व्हावं आम्ही सैन्य माघारी बोलावू.

- राजा हरीसिंग ने काश्मीर तुम्हाला दिलंय, काश्मिरी जनतेला अजून एकाही माणसाने विचारलं नाहीये. 1948 पासून काश्मिरात सार्वमत घ्यावे याला भारत आणि पाकिस्तान टाळतायत. आणि जर ते लोक तुमचे नाहीयेत तर कुणी सांगितलंय तुम्हाला तिथे जाऊन चौकीदारी करायला आणि बर्फात मरायला. करा त्यांना मोकळे आणि ठरवू द्या त्यांना कि त्यांच्यात भांडून मरायचंय, कि पाकीस्तानात जायचंय, कि भारतात जायचंय कि स्वतंत्र देश म्हणून रहायचंय!

थोडक्यात सांगतो... काश्मीरी जनतेचे एका बाजूला भारतीय कट्टर राष्ट्रवादी लोकांनी आणि त्यांच्या कट्टर राष्ट्रवादी सरकारने आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तानमधले तिकडचे कट्टर धार्मिक नेते आणि पाकिस्तान सरकार यांनी लचके तोडलेत. या सगळ्या प्रकारात जो भारताकडे झुकेल तो पाकिस्तानच्या दृष्टीने फुटीरवादी, जो पाककडे झुकेल तो भारताच्या दृष्टीने फुटीरतावादी आणि जो स्वतंत्र काश्मीर मागेल तो दोन्हीच्या दृष्टीने अतिरेकी. हा नीचपणा 68 वर्ष चालू आहे. यात काश्मिरी मुस्लिम आणि पंडित दोन्ही भरडले गेले, विस्थापित झाले आणि मेले.

काश्मीर ही एक देवदासी झालीय जिला अख्ख्या गावाने भोगावे आणि तिच्या पोरांना वाऱ्यावर सोडावे. आदिवासी ह्या जणू काही अनौरस औलादी आहेत ह्या देशाच्या ज्यांना कुठले हक्कच नाहीत.
माझ्या घरात ४ पिढ्या सैन्यात वाढल्यात आणि मेल्यात, अगदी दुसऱ्या महायुद्धापासून. आणि तरीसुद्धा सैन्य किंवा सशस्त्र दलाच्या कुठल्याही अत्याचारच मी समर्थन करणार नाही. AFSPA एवढाच आवडतो तर घ्या लावून महाराष्ट्रात आणि दर १५ नागरिकांमागे license to kill असणारा एक सशस्त्र जवान ठेवून 68 वर्ष जगून दाखवा! हिंमत असेल तर करून दाखवा!

-  फेसबुक पोस्ट ( १७ जुलै २०१६, १३.३५ )

No comments:

Post a Comment