एकदा
एका गावात संसर्गजन्य रोगाची साथ आली. सारे गाव त्या आजाराने बाधित झाले
होते आणि दररोज काहीजण मृत्यमुखी पडत होते. वास्तविक पाहता त्या आजाराचा
ईलाज खूप सोपा आणि साथ पटकन आटोक्यात आणणारा होता. त्यामुळे वैद्यकीय
पुस्तके सुद्धा त्या आजाराची कालबाह्य साथीच्या आजारात वर्गवारी करत. पण
तरी पण हा रोग एवढा बळावलाच कसा म्हणून जागतिक स्तरावरील वैद्यकीय
तज्ज्ञांना आश्चर्य वाटले.
जगभरातील नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांचे, संशोधकांचे एक पथक लागलीच गावात रवाना झाले सोबत औषधांचा साठा घेऊन. गावात शिरताच जिकडे पाहावे तिकडे आजारी रुग्ण दिसायला लागले. वैद्यकीय पथकाने गावच्या पंचायतीच्या कार्यालयात छोटेखानी दवाखाना उभारला आणि गावात ध्वनिक्षेपकावरून घोषणा केली कि सर्वांनी पंचायतीतल्या दवाखान्यात येऊन औषध घेऊन जावे, जे औषध रोग 1-2 दिवसात समूळ बरा करेल आणि कुणीही दगावणार नाही. पूर्ण दिवस निघून गेला तरी एकही गावकरी रोगी दवाखाण्याकडे फिरकला नाही.
शेवटी वैद्यकीय पथकानेच घरोघर जाऊन रुग्णांवर उपचार करावे असे त्या रात्री तज्ज्ञांनी ठरवले. दुसरा दिवस उजाडताच वैद्यकीय पथक पंचायतीला लागून असणाऱ्या घरात गेले. आत जाऊन पाहतात तो सगळेच रोगाने बाधित. त्या घरातील एका रुग्णावर उपचार करणार तेवढ्यात तो रोगी कडाडला,"तुम्हाला माझ्याच घरातले आजारी दिसतायत?? शेजारी बघा आमच्यापेक्षा जास्त आजारी आहेत. जा, आधी त्यांचा ईलाज करा!" त्या रोग्याचे शेजारच्या घराबद्दलचे प्रेम पाहून तज्ज्ञ सुद्धा अवाक झाले. त्याच्या इच्छेचा मान ठेवीत, ते शेजारच्या घरात शिरले, तर तिथेही सगळे रोगी. त्या शेजारच्या कुटुंबातील गृहप्रमुख पण खेकसला, "तुम्हाला माझ्याच घरातले आजारी दिसतायत?? शेजारी बघा आमच्यापेक्षा जास्त आजारी आहेत. जा, आधी त्यांचा ईलाज करा!" नाईलाजाने त्याही घरातून तज्ज्ञ बाहेर पडले आणि पुढच्या घरात गेले. तिथेही तोच अनुभव!
एरव्ही आजारावर औषधोपचार घेण्यासाठी व जीव वाचवण्यासाठी रुग्णांची झुंबड उडते असा तज्ज्ञांचा अनुभव होता. पण हे गाव त्याला अपवाद ठरत होते. इथे ज्याला भेटावं तो शेजारच्या घरी पाठवत होता. अक्खा दिवस फिरून तज्ञांचे पथक एकाही माणसावर उपाय करू शकले नाहीत. फिरून पथक पंचायतीत आले. पथकाने ठरवले कि आता बळजबरीने उपचार करायचे लोकांवर, याला पर्याय नाही. पथक परत पहिल्या घरात शिरले आणि तिथल्या गृहप्रमुखाला पकडून औषधोपचार करणार तेवढयात त्या घरातील बाकीच्या सदस्यांनी त्या तज्ञाला धरून चोप द्यायला सुरुवात केली.
इतका वेळ तळमळत पडलेला आजारी कुटुंबप्रमुख बेंबीच्या देठापासून बोंबलत शेजारच्या घरातील लोकांना बोलावू लागला कि "हे बघा हे काय चाललंय! मी यांना आधी बाकीच्या आजारी लोकांना बघा म्हणून सांगतोय तर हे माझ्यावरच जबरदस्ती करतायेत!! पकडा आणि बदडा यांना!!" पाहता पाहता सारे गाव गोळा झाले आणि वैद्यकीय पथकाच्या विरोधात उभे ठाकले. त्यातून एक म्होरक्या पण समोर आला आणि बोलला,"जगात बाकीच्या देशात, गावात हे आजार असताना तुम्ही आमच्याच गावात का तडफडताय? आमचे आम्ही बघून घेऊ! तुमचा हक्कच काय आमच्यावर औषधोपचार करायचा? खबरदार जर इथे दिसाल तर!! नरडीचा घोट घेऊ आम्ही सगळे मिळून तुमच्या!!"
म्होरक्याच्या त्या गर्जनेने सगळे गाव चेतले, एक झाले आणि या वैद्यकीय पथकावर चाल करायच्या पवित्र्यात उभे राहिले. तज्ज्ञांच्या पथकापुढे दोनच पर्याय होते आता, स्वतःचा जीव वाचवा किंवा त्या गावाचा. तज्ज्ञांनी पहिला पर्याय निवडला आणि ते त्या गावातून निघून गेले, गावाला मरण्यासाठी सोडून.
या गावाचा आणि या देशाचा, या घरांचा आणि इथल्या धर्मांचा, या रोग्यांचा आणि इथल्या लोकांचा काही संबंध तुम्हाला लागल्यास त्याला अजिबात योगायोग समजू नका.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १३ जुलै २०१६, २१.४३ )
जगभरातील नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांचे, संशोधकांचे एक पथक लागलीच गावात रवाना झाले सोबत औषधांचा साठा घेऊन. गावात शिरताच जिकडे पाहावे तिकडे आजारी रुग्ण दिसायला लागले. वैद्यकीय पथकाने गावच्या पंचायतीच्या कार्यालयात छोटेखानी दवाखाना उभारला आणि गावात ध्वनिक्षेपकावरून घोषणा केली कि सर्वांनी पंचायतीतल्या दवाखान्यात येऊन औषध घेऊन जावे, जे औषध रोग 1-2 दिवसात समूळ बरा करेल आणि कुणीही दगावणार नाही. पूर्ण दिवस निघून गेला तरी एकही गावकरी रोगी दवाखाण्याकडे फिरकला नाही.
शेवटी वैद्यकीय पथकानेच घरोघर जाऊन रुग्णांवर उपचार करावे असे त्या रात्री तज्ज्ञांनी ठरवले. दुसरा दिवस उजाडताच वैद्यकीय पथक पंचायतीला लागून असणाऱ्या घरात गेले. आत जाऊन पाहतात तो सगळेच रोगाने बाधित. त्या घरातील एका रुग्णावर उपचार करणार तेवढ्यात तो रोगी कडाडला,"तुम्हाला माझ्याच घरातले आजारी दिसतायत?? शेजारी बघा आमच्यापेक्षा जास्त आजारी आहेत. जा, आधी त्यांचा ईलाज करा!" त्या रोग्याचे शेजारच्या घराबद्दलचे प्रेम पाहून तज्ज्ञ सुद्धा अवाक झाले. त्याच्या इच्छेचा मान ठेवीत, ते शेजारच्या घरात शिरले, तर तिथेही सगळे रोगी. त्या शेजारच्या कुटुंबातील गृहप्रमुख पण खेकसला, "तुम्हाला माझ्याच घरातले आजारी दिसतायत?? शेजारी बघा आमच्यापेक्षा जास्त आजारी आहेत. जा, आधी त्यांचा ईलाज करा!" नाईलाजाने त्याही घरातून तज्ज्ञ बाहेर पडले आणि पुढच्या घरात गेले. तिथेही तोच अनुभव!
एरव्ही आजारावर औषधोपचार घेण्यासाठी व जीव वाचवण्यासाठी रुग्णांची झुंबड उडते असा तज्ज्ञांचा अनुभव होता. पण हे गाव त्याला अपवाद ठरत होते. इथे ज्याला भेटावं तो शेजारच्या घरी पाठवत होता. अक्खा दिवस फिरून तज्ञांचे पथक एकाही माणसावर उपाय करू शकले नाहीत. फिरून पथक पंचायतीत आले. पथकाने ठरवले कि आता बळजबरीने उपचार करायचे लोकांवर, याला पर्याय नाही. पथक परत पहिल्या घरात शिरले आणि तिथल्या गृहप्रमुखाला पकडून औषधोपचार करणार तेवढयात त्या घरातील बाकीच्या सदस्यांनी त्या तज्ञाला धरून चोप द्यायला सुरुवात केली.
इतका वेळ तळमळत पडलेला आजारी कुटुंबप्रमुख बेंबीच्या देठापासून बोंबलत शेजारच्या घरातील लोकांना बोलावू लागला कि "हे बघा हे काय चाललंय! मी यांना आधी बाकीच्या आजारी लोकांना बघा म्हणून सांगतोय तर हे माझ्यावरच जबरदस्ती करतायेत!! पकडा आणि बदडा यांना!!" पाहता पाहता सारे गाव गोळा झाले आणि वैद्यकीय पथकाच्या विरोधात उभे ठाकले. त्यातून एक म्होरक्या पण समोर आला आणि बोलला,"जगात बाकीच्या देशात, गावात हे आजार असताना तुम्ही आमच्याच गावात का तडफडताय? आमचे आम्ही बघून घेऊ! तुमचा हक्कच काय आमच्यावर औषधोपचार करायचा? खबरदार जर इथे दिसाल तर!! नरडीचा घोट घेऊ आम्ही सगळे मिळून तुमच्या!!"
म्होरक्याच्या त्या गर्जनेने सगळे गाव चेतले, एक झाले आणि या वैद्यकीय पथकावर चाल करायच्या पवित्र्यात उभे राहिले. तज्ज्ञांच्या पथकापुढे दोनच पर्याय होते आता, स्वतःचा जीव वाचवा किंवा त्या गावाचा. तज्ज्ञांनी पहिला पर्याय निवडला आणि ते त्या गावातून निघून गेले, गावाला मरण्यासाठी सोडून.
या गावाचा आणि या देशाचा, या घरांचा आणि इथल्या धर्मांचा, या रोग्यांचा आणि इथल्या लोकांचा काही संबंध तुम्हाला लागल्यास त्याला अजिबात योगायोग समजू नका.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १३ जुलै २०१६, २१.४३ )
No comments:
Post a Comment