१. देवाची आणि भूतांची दोन्हीची अजिबात भीती नाही.
२. संकटसमयी कुणाचा धावा करण्याची गरज नाही कारण स्वतः हातपाय हलवायची सवय लागते.
३. आपल्याला झालेली मुले हि आपल्या कष्टाने झालेली असतात, देवांचा-संतांचा आशीर्वाद (कार्यभाग) त्यात नसतो.
४. मटन आणताना, केस कापताना "आज कुठला वार आहे?" हि मूर्ख चौकशी करावी लागत नाही.
५. घरात मुर्त्या गोळा करून त्यांना रोज आंघोळ, पूजा असले प्रकार करावे लागत नाहीत.
६. गुडघे दुखवत नमाज किंवा वंदना करायची गरज नाही.
७. सारे प्राणी खाण्यास योग्य असल्याने उगीच बाहेर गेल्यावर फक्त चिकन खायची सक्ती नाही.
८. कुठल्याही दिवशी, कधीही, काहीही खाता-पिता येत … अगदी बिनधास्त !
९. मेल्यावर अंत्यविधी आणी नंतरच्या विधीचा खर्च नाही.
१०. लग्न बिनाहुंडा, स्वस्तात मस्त करून उरलेले पैसे हनिमून साठी वापरता येतात.
११. बारसे, मुंज, सुंता, बाप्तिस्मा इत्यादी बालपणीच्या कटकटी बिलकुल नाहीत.
१२. पुजारी, पाद्री, भन्ते, इमाम इत्यादी लोकांना बिनधास्त भांडता येत … गरजच काय मेल्यांची मला?
१३. उपास-तापास, रोजे, करवा-चौथ, चातुर्मास यापासून पूर्ण मुक्ती.
१४. बाळाचे नाव ठेवताना जगातले सगळे पर्याय उपलब्ध असतात.
१५. प्रेमात पडताना, लग्न करताना पुढचा माणूस कुठल्या धर्माचा आहे हे पाहायची गरज शुन्य … सरळ भिडा !
१६. सगळ्या धर्माच्या, सगळ्या सणांची सारी पक्वान्ने आनंदाने चाखता येतात … कोणतेही व्रतवैकल्ये न करता.
१७. पंचांग-तिथी बघून सेक्स करायचा मूर्खपणा नाही. आली लहर, केला कहर !
१८. कुठल्याही दिशेला डोके किंवा पाय करून झोपा.
१९. सगळ्या जाती-धर्माच्या मिरवणुकांच्या नावे सरसकट बोटे मोडता येतात … झेंडा बघायची गरज नाही.
२०. स्वर्ग-नरक, कयामत, पुनर्जन्म असल्या भंपक कल्पनांचा त्रास, भीती नाही.
२१. सक्तीची दक्षिणा, जकात नाही … थोडक्यात खिशाला चाट नाही.
२२. 'अलिफ-लैला' असो कि 'जय मल्हार' … दोन्ही सिरियलच्या मुर्खपणाला हसता येत

२३. कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवता येत, भाड्याने घर पण सहज मिळते …. नास्तिक सर्वमान्य आहेत !
२४. धार्मिक मुद्द्यांवरच्या TV वरच्या चर्चा पाहून panel वरच्या लोकांची कीव करता येते.
२५. प्रार्थना, स्तोत्रे, आयाती इत्यादी बिनकामाचे पाठांतर नाही.
२६. "मुलांना काही धार्मिक शिकवत नाही का?" या प्रश्नाला हसून निकाली काढता येत.
२७. रविवारी उशिरापर्यंत मस्त ताणून देता येते … चर्चात किंवा विहारात जायचं आहे कुणाला इथे?
२८. दंगली, धर्मयुद्ध, जिहाद आदी मूर्खपणाला कवटाळण्याची गरज नाही …. सुखाने जगता येत.
.
.
हुश्श … थकलो लिहून.
थोडक्यात सांगू, सगळ्यांना कोलून आयुष्य स्वत:च्या सोयीने-इच्छेने, विवेकाने, आनंदात, शांततेत आणि कुठल्याही आडकाठी शिवाय जगता येत. मला तरी तेवढंच पुरेसं आहे …. तुम्हाला काय हवंय ते तुम्ही ठरवा !!
- फेसबुक पोस्ट ( १३ जून २०१६, १५.४७ )
थोडक्यात सांगू, सगळ्यांना कोलून आयुष्य स्वत:च्या सोयीने-इच्छेने, विवेकाने, आनंदात, शांततेत आणि कुठल्याही आडकाठी शिवाय जगता येत. मला तरी तेवढंच पुरेसं आहे …. तुम्हाला काय हवंय ते तुम्ही ठरवा !!
- फेसबुक पोस्ट ( १३ जून २०१६, १५.४७ )
No comments:
Post a Comment