तथाकथित विचारवंतांचे विद्रुप चेहरे आता सर्व समाजात आहेत यावर मनात कसलाही
संदेह नाही. कुणीही आम्ही बुद्धिवादी आहोत चा दंभ करण्यात कसलाही अर्थ
नाही. शेवटी माणूस कधी वर्ण तर कधी वर्ग व्यवस्था निर्माण करून स्वतःच खोटं
मोठेपण जपणारच. समता किंवा बंधुभाव हा पुस्तकांपेक्षा संस्कारांचा भाग
असावा बहुतेक असं वाटतय आता.
आई-वडील आणि आजूबाजूचा समाज जे संस्कार करतो ते लोक आयुष्यभर पुढे नेतात त्यात जवळपास कसलाही बदल न करता. व्यक्ती मध्ये मूलभूत बदल फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा ती स्वतः प्रश्न विचारते, स्वतःची गृहीतके काळाच्या आणि स्वतंत्र विचारांच्या कसोटीवर घासून पाहते. स्वतःच मन, मेंदू उघडा ठेवून बदल स्वीकारते किंवा नव्या बदलाची सुरुवात करते. आणि स्वतःला किंवा स्वतःच्या संस्कारांना आणि विचारांनाआव्हान देण हि सगळ्यात अवघड गोष्ट आहे, कारण तिथे सारे अभिनिवेश बाजूला ठेवून एक नव्या माणसाचा जन्म होतो. कदाचित म्हणूनच असा नवा माणूस शेकडो वर्षात एखादा जन्माला येतो, बुद्ध-महावीर असो कि कबीर-ज्ञानेश्वर-तुकाराम हि लोक म्हणूनच दुर्मिळ आहेत कारण ती जिवंत लोक होती. बाकी आपण सारे जुन्या संस्करांचं ओझं वाहणारी मढी.
गेल्या 3-4 दिवसात एक गोष्ट प्रकर्षांने अनुभवली जी ओशो नि खूप वेळा सांगितली "सत्य कुणाला देता येत नाही, ती संपत्ती सारखी हस्तांतरित करायची गोष्ट नाही". सबब, आजपासून कुणालाही काही सांगण्यापेक्षा स्वतः स्वत:ला प्रश्न विचारून स्वतःची चिकित्सा सुरु करीन. एक माणूस अक्ख जग बदलू शकत नाही मग तो कुणीही असो. ते बुद्धाला जमलं नाही आणि गांधीना पण. "महात्मे येतात नि जातात, थोडा धुरळा उडतो, जग बदलत नाही" असा काहीसा वाक्य बाबासाहेब गांधींना बोलल्याचे वाचल्याचे स्मरतेय. तीच अवस्था बाबासाहेबांची पण होतेय यात संशय राहिला नाहीय.
मानवजातीच्या उगमापासून अंतापर्यंत इथे फक्त दोनच प्रकारची लोक होती 'आतली आणि बाहेरची'. व्यवस्था ताब्यात असणारी आणि व्यवस्थेची गुलाम असणारी. आजचे गुलाम उद्या सत्ताधीश आणि आजचे सत्ताधीश उद्या गुलाम, हा खेळ अनंत काळ चालणार आहे. आणि प्रत्येक जण या खेळात आपल्या भूमिकेचं समर्थन करत राहणार आहे कारण ते त्यांचं वैयक्तिक सत्य आहे. मला स्वतःला तरी या व्यवस्थेच्या चक्रातून बाहेर पडायचं आहे, मला ना गुलामी नकोय ना सत्ता, ना माझी स्वतःची दुसरी समांतर व्यवस्था. मी माझा 'एकला चलो रे' करणार आहे. मला मुक्त व्हायचंय.
- फेसबुक पोस्ट (१७ एप्रिल २०१६, ०७.३५)
आई-वडील आणि आजूबाजूचा समाज जे संस्कार करतो ते लोक आयुष्यभर पुढे नेतात त्यात जवळपास कसलाही बदल न करता. व्यक्ती मध्ये मूलभूत बदल फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा ती स्वतः प्रश्न विचारते, स्वतःची गृहीतके काळाच्या आणि स्वतंत्र विचारांच्या कसोटीवर घासून पाहते. स्वतःच मन, मेंदू उघडा ठेवून बदल स्वीकारते किंवा नव्या बदलाची सुरुवात करते. आणि स्वतःला किंवा स्वतःच्या संस्कारांना आणि विचारांनाआव्हान देण हि सगळ्यात अवघड गोष्ट आहे, कारण तिथे सारे अभिनिवेश बाजूला ठेवून एक नव्या माणसाचा जन्म होतो. कदाचित म्हणूनच असा नवा माणूस शेकडो वर्षात एखादा जन्माला येतो, बुद्ध-महावीर असो कि कबीर-ज्ञानेश्वर-तुकाराम हि लोक म्हणूनच दुर्मिळ आहेत कारण ती जिवंत लोक होती. बाकी आपण सारे जुन्या संस्करांचं ओझं वाहणारी मढी.
गेल्या 3-4 दिवसात एक गोष्ट प्रकर्षांने अनुभवली जी ओशो नि खूप वेळा सांगितली "सत्य कुणाला देता येत नाही, ती संपत्ती सारखी हस्तांतरित करायची गोष्ट नाही". सबब, आजपासून कुणालाही काही सांगण्यापेक्षा स्वतः स्वत:ला प्रश्न विचारून स्वतःची चिकित्सा सुरु करीन. एक माणूस अक्ख जग बदलू शकत नाही मग तो कुणीही असो. ते बुद्धाला जमलं नाही आणि गांधीना पण. "महात्मे येतात नि जातात, थोडा धुरळा उडतो, जग बदलत नाही" असा काहीसा वाक्य बाबासाहेब गांधींना बोलल्याचे वाचल्याचे स्मरतेय. तीच अवस्था बाबासाहेबांची पण होतेय यात संशय राहिला नाहीय.
मानवजातीच्या उगमापासून अंतापर्यंत इथे फक्त दोनच प्रकारची लोक होती 'आतली आणि बाहेरची'. व्यवस्था ताब्यात असणारी आणि व्यवस्थेची गुलाम असणारी. आजचे गुलाम उद्या सत्ताधीश आणि आजचे सत्ताधीश उद्या गुलाम, हा खेळ अनंत काळ चालणार आहे. आणि प्रत्येक जण या खेळात आपल्या भूमिकेचं समर्थन करत राहणार आहे कारण ते त्यांचं वैयक्तिक सत्य आहे. मला स्वतःला तरी या व्यवस्थेच्या चक्रातून बाहेर पडायचं आहे, मला ना गुलामी नकोय ना सत्ता, ना माझी स्वतःची दुसरी समांतर व्यवस्था. मी माझा 'एकला चलो रे' करणार आहे. मला मुक्त व्हायचंय.
- फेसबुक पोस्ट (१७ एप्रिल २०१६, ०७.३५)
No comments:
Post a Comment