WTO नंतर भारतासारख्या मोठ्या देशाला जगाच्या बाजारात टिकून राहायचे
असेल तर उद्योगधंदे हा एकमेव मार्ग आहे. आणि जितका देश प्रगत होत जातो
तितके त्याचे primary economic activities (उदा: शेती, खाणकाम, मासेमारी इ)
मधून येणारे उत्पन्न रोडावत जाते. त्यामुळे साहजिकच येत्या काळात शेतीची
समस्या अजून बिकट होणार आहे. शेती व शेतीपूरक धंदे यावर आधारित समाज आणि
कुटुंबे यांची वाताहत होणे अटळ आहे. ग्रामीण भारत स्वतःच्याच
अडाणी/बेरोजगार लोकसंख्येच्या ओझ्याने, कमी उत्पादकतेने आणि जातीय/पंचायती
व्यवस्थेने रसातळाला जाणार आहे.
काही अनुमानांनुसार 2025 पर्यंत भारतात 50% लोक शहरांत राहतील. भारतात आज
असणारा डॉक्टर्सचा तुटवडा भरायला किमान 25 वर्षे लागतील. त्यामुळे येत्या
15 वर्षात तरी खेड्यात चांगले डॉक्टर मिळणार नाहीत. शिक्षणात पाहावे तर 10%
पेक्षा कमी लोक भारतात graduate होतात, आणि जे graduate होतात त्यांच्यात
employable लोकांची संख्या नगण्य आहे. जे काही शिक्षण देशात उपलब्ध आहे ते
शहरात आहे. रोजगाराच्या नव्या संधी पण फक्त शहरांमध्येच निर्माण होतील.
खेडी आणि शेती हे भारताचे अवघड जागचे दुखणे होणार आहे येत्या 2-3 दशकांत. ज्यांना भविष्य घडवायचे आहे, त्यांनी चुकूनसुद्धा खेड्यांची आणि शेतीची वाट धरू नये.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १५ ऑक्टोबर २०१६, ०२.०७ )
खेडी आणि शेती हे भारताचे अवघड जागचे दुखणे होणार आहे येत्या 2-3 दशकांत. ज्यांना भविष्य घडवायचे आहे, त्यांनी चुकूनसुद्धा खेड्यांची आणि शेतीची वाट धरू नये.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १५ ऑक्टोबर २०१६, ०२.०७ )
No comments:
Post a Comment