Thursday, January 5, 2017

धर्मांतर

बौद्ध धर्मात/धम्मात प्रवेश करणे ही डॉ.आंबेडकरांची ऐतिहासिक चूक होती. त्यांना हिंदू म्हणून मरायचे नव्हते हे योग्य होते, पण त्यातून बाहेर पडताना त्यांनीच लिहिलेल्या संविधानावर आधारित धर्मनिरपेक्ष देशात हिंदू धर्माचा कायदेशीर त्याग करून ते स्वतः धर्मनिरपेक्ष नागरिक म्हणून जगू शकले असते.

एक छान पायंडा पडला असता त्याने. हिंदू, मुस्लिम असो कि अजून कुठल्याही धर्मात जन्मूनही स्वतःच्या धर्मातील मूर्खपणा, अमानवी परंपरा मान्य नसणाऱ्या अशा पुढारलेल्या, मानवतावादी लोकांना एक सुंदर पर्याय त्याने मिळाला असता. जसजसा लोकांचा धर्माच्या बाबतीतला अट्टाहास कमी होत गेला असता, तसे लोक इथे गोळा होऊ शकले असते, जाती/धर्म तुटायला हळूहळू सुरुवात झाली असती.

एका धर्माच्या आजारपणाला उतारा म्हणून दुसऱ्या धर्माचा आजार हा पर्याय खरंच चुकीचा होता. बौद्धधर्म हा सार्वकालिक असता तर भारतातून नामशेष झालाच नसता. पण तो तसा भूतकाळात नामशेष झालाय, हिंदू धर्माच्या बुद्धिभेद करण्याच्या शक्तीपुढे हरलाय सुद्धा आणि भविष्यात सुद्धा परत हरू शकतो.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २७ ऑक्टोबर २०१६, १४.३६ )

No comments:

Post a Comment