Thursday, January 5, 2017

विकृती

या देशात खरे बोलणाऱ्याच्या हेतूंवर शंका आणि धादांत खोटे बोलणाऱ्यांचं उखळ नेहमी पांढरे आहे. रामदेव, सत्यसाई, आसाराम अब्जाधीश नाही झाले? हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना तुरुंगातून सोडा म्हणून मोर्चे नाही निघाले? खुनी खासदाराच्या जेलबाहेर स्वागताला हजारोंनी लोक नाही गेले?

या देशातला आदर्शवाद, इथली लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता भंपक आहे. इथल्या सगळ्या लोकांमध्ये जातीयवाद, वर्णवाद कुटून भरलेला आहे आणि कुठलाही धर्म इथे शांतीचा वाहक नाहीये. एका विकृत देशात, एका विकृत काळात मी जगतोय हे मला पूर्णतः पटलेलं आहे. बाकी या देशाने कबीर, तुकाराम सुद्धा जिरवून टाकले, त्यामुळे शतके बदलली तरी वृत्ती काही बदलणार नाहीये.

जे जे होईल ते ते पाहत राहणे ... फक्त !!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १९ ऑक्टोबर २०१६, २३.४३ )
 

No comments:

Post a Comment