तर्काच्या आणि बुद्धिप्रामान्यवादाच्या गोष्टी करून, स्वतःच्या विरोधात
एक आवाज आला की लगेच झुंडीने हल्ला करून, कोलाहल माजवून, त्या व्यक्तीला
वैयक्तिक कुचेष्टेने नको-नको करायचे आणि मग त्या व्यक्तीने एक वाक्य
वैयक्तिक बोलले कि त्यातून सुतावरून स्वर्ग गाठायचे, त्याच्याबद्दल राळ
उडवून द्यायची..... हा चर्चेचा फेसबुकी पॅटर्न परत एकदा अनुभवला...
तथाकथित आंबेडकरी झाले, संघी झाले, जातीयवादी झाले, बुद्धीप्रामाण्यवादी
झाले.
माणसे झुंडीने राहायला शिकली किंवा एखाद्या विचारधारेत आंधळी झाली की तर्काशी फारकत घेतात.
सकाळीच एक मित्र म्हणाला होता "तुझी अवस्था पंचतंत्रातल्या गोष्टीतल्या पक्ष्यासारखी करतील ज्याला माकडांनी मारले होते." काहीही खोटे नव्हते त्यात.
यापुढे राजकारण, समाजकारण, धर्मकारण आणि जे काही असेल त्याबाबत काहीही बोलणे नाहीये. या देशात सगळेच विद्वान आहेत आणि ते सगळे माझ्या मित्रयादीत आहेत. त्या समस्त विद्वानांना कोपरापासून नमन _/\_
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १० ऑक्टोबर २०१६, १७.२३ )
माणसे झुंडीने राहायला शिकली किंवा एखाद्या विचारधारेत आंधळी झाली की तर्काशी फारकत घेतात.
सकाळीच एक मित्र म्हणाला होता "तुझी अवस्था पंचतंत्रातल्या गोष्टीतल्या पक्ष्यासारखी करतील ज्याला माकडांनी मारले होते." काहीही खोटे नव्हते त्यात.
यापुढे राजकारण, समाजकारण, धर्मकारण आणि जे काही असेल त्याबाबत काहीही बोलणे नाहीये. या देशात सगळेच विद्वान आहेत आणि ते सगळे माझ्या मित्रयादीत आहेत. त्या समस्त विद्वानांना कोपरापासून नमन _/\_
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १० ऑक्टोबर २०१६, १७.२३ )
No comments:
Post a Comment