Thursday, January 5, 2017

राष्ट्रीय असंतोषाचे जनक -


डॉ. आंबेडकरांच्या एका राजकीय कृतीची २ ओळीत चिकित्सा केली म्हणून चिडून मी थेट संघी असल्याचे प्रमाणपत्र आंबेडकरवाद्यांनी दिले आहे. संघावर मी आजवर केलेल्या टीकेने संघ पण नाराज आहे, त्यामुळे भागवतकाका पण काही जवळ करणार नाहीत. रामदेव बाबा ला भोंदू वैदू म्हणल्याने तेही काही धंद्यात सामील करून घेणार नाहीत. झाकीर नाईक ची अक्कल काढल्याने आता मी ईस्लामसाठी पण हराम असेन. प्रभू येशूच्या नावाने पोस्ट लिहिल्याने येशू पण नाराज.

नास्तिक मेळाव्याला प्रश्न विचारला कि तेही शिव्याशाप देत बसले. 'नर ना मादी ते समाजवादी' म्हणल्याने समाजवादी पण नाराज. मराठा मोर्चांबद्दल लिहिल्याने दोन्ही काँग्रेस नाराज. मोदीभक्त तर कायमचे नाराज. 'खाटेवर चर्चा होत नाही, लेकरे होतात' हे सांगून राहुलभक्तांचा रोष. राजबाबू च्या विविधगुणदर्शन कार्यक्रमाला हसल्याने मनसे पाण्यात पाहणार. आठवलेना संसदेत बोलायचे कळत नाही म्हणल्याने तेही चिडलेले. अंनिस च्या वारीला आक्षेप घेतला कि तेही चिडले. आज सानेगुरुजींचे शिष्य कावले.

मागे साईबाबा बद्दल लिहिले तेव्हापासून बाबा कोपलेले. 'देऊळ बंद' च्या समीक्षेने स्वामी समर्थ स्वतःच माझ्या पाठीमागून निघून गेले. बाकी श्रीश्री, आसाराम, पप्पू आठवले आदी पामरांना तर नेहमीच कोललेले आहे. तेव्हा आता त्रैलोक्यात कुणीही प्रेमळ आश्रयदाता राहिला नाहीये.

आता 'राष्ट्रीय असंतोषाचे जनक' हि पदवी स्वतःला लावून घेण्याची जाम इच्छा आहे. टिळकांनंतर बरेच दिवस त्या पदवीला कुणी वाली राहिला नाहीये. एखादा छोटेखानी समारंभ लवकरच बोलवू आणि करून टाकू जाहीर. कसे ???

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २९ ऑक्टोबर २०१६, ०१.४८ )

No comments:

Post a Comment