Saturday, January 21, 2017

निवडणुका आणि नागरिक

निवडणुकांच्या निकालाने लोकांनी भारावून जाणे, लोकांनी लोकप्रतिनिधींच्या मागे वेडे होऊन फिरणे यात लोकशाहीची हार आहे. लोकांमध्ये लोकप्रतिनिधींकडून काम करवून घेण्याची, त्यांना जाब विचारण्याची आणि बदलण्याची ताकत जेव्हा येईल तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने येईल. अन्यथा खुर्चीत बसणाऱ्यांची फक्त आडनावे आणि पक्ष बदलतील, बाकी काही फरक पडणार नाही.

भारतातली आम जनता स्वतःला देवदासी समजून जगतेय आणि राजकारणी स्वतःला त्या देवदासीच्या असंख्य फुकट्या ग्राहकांपैकी एक. आज रात्रीला जो सोबत असेल त्या फुकट्या ग्राहकाची चंगळ असते, देवदासीला ते रोजचंच आहे. कुणीही येणार, फुकट उपभोगून जाणार आणि वरून शिव्याही देणार.

भारतातल्या शाळांमध्ये संविधान, नागरिकशास्त्र शिकवलं जात नाही ते असल्या देवदासी पिढ्या तयार व्हाव्या म्हणूनच. आणि मोदींच्या कार्याला रस्त्यावर उतरून सडेतोड विरोध गांधी करत नाहीत, कारण त्यांच्यात mutual understanding आहे की कुणी या देवदासीला किती वेळ आणि कसं भोगून घ्यायचं.

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( २९ नोव्हेंबर २०१६, ०९.२४ )

No comments:

Post a Comment