लहान मुलांचा एक छान खेळ आहे, ज्यात एक मुलगा
शिवाजी (खेळातला राजा, छत्रपतींशी याचा संबंध जोडू नये) बनतो आणि बाकीच्या
मुलांना काहीही करायला सांगतो, जसे की "शिवाजी म्हणतो बसा" आणि मग सगळी
मुले बसतात. अचानक तो मुलगा बोलतो "शिवाजी म्हणतो नाचा" आणि सगळी मुले
नाचायला लागतात.
खेळातला शिवाजी हा त्या खेळातील बाकीच्या मुलांना काहीही अनिर्बंध, अतार्किक आदेश एकामागून एक देत असतो आणि बाकीची मुले खेळ किंवा मज्जा म्हणून तो आदेश स्विकार करत असतात, शिवाजीला काहीही प्रश्न न विचारता, विरोध न करता.
आपला देश आजकाल या "शिवाजी म्हणतो" खेळासारखा झालाय. आणि आमच्या 'शिवाजी' च्या काही क्रांतिकारी कल्पना आणि त्यांचे निर्वाहन एकामागून एक असे झाले -
१) शिवाजी म्हणतो, "भारतातल्या सगळ्या लोकांना 'जन-धन' बँक अकाऊंट काढून द्या" -
समस्त सरकारी बँकाचे कर्मचारी सगळी कामे सोडून 22 कोटी अकाउंट उघडतात, कसलेही कागदपत्र पडताळणी न करता. एका अकाउंट मध्ये सरासरी रक्कम 1700. त्यातली बहुतांश अकाउंट शून्य पैसे जमा दाखवतात.
२) शिवाजी म्हणतो, "बँकांनी शून्य जमा असणाऱ्या 'जन-धन' अकाउंट मध्ये काही रक्कम जमा करावी" -
झाला ना Zero balance वाल्या अकाउंट चा डाग दूर?
३) शिवाजी म्हणतो, "60% दंड भरून काळा पैसा पांढरा करून घ्या" -
अवघे 4000 कोटी जमा होतात.
४) शिवाजी म्हणतो, "45% दंड भरून काळा पैसा पांढरा करून घ्या" -
64000 कोटी जमा होतात, पण शिवाजीने तर लाखो कोटी कोटी रुपये काळा पैसा असल्याचे भाकीत केलेलं असते!
५) थोडासा वैतागून शिवाजी म्हणतो, "500 आणि 1000 च्या नोटा बाद करा, आणि 500, 2000 च्या नव्या नोटा चलनात आणा. बघा काळा पैसा ठेवणारे कसे मरतात ते!" -
प्रत्यक्षात फक्त सामान्य लोकच मरायला लागतात ATM, बँके समोरच्या रांगेत, इस्पितळात आणि पैसा नाही म्हणून काम-धंदा ठप्प झाल्याने. एकही काळा पैसा वाला काही मरत नाही की एकालाही वेड लागत नाही. आणि नवीन नोटांचे प्रश्न तर अजून वेगळेच, त्या मिळतही नाहीत आणि मिळालेल्या खऱ्या की खोट्या त्या पण कळत नाहीत.
६) मग शिवाजी थोडा रडून दाखवतो आणि म्हणतो, "मी तुमच्यासाठी घर, परिवार सोडलंय. मला फक्त 50 दिवस द्या" -
जनताही भारावून जाते मग.
७) नंतर शिवाजी थोडा वेडा होतो आणि एकामागून एक उलटसुलट आज्ञा रोज द्यायला लागतो.
"4000 रुपये रोज बदलून घेऊ शकता"
"4500 रुपये रोज बदलून घेऊ शकता"
"2000 रुपये रोज बदलून घेऊ शकता"
"हॉस्पिटल, रेल्वे, पेट्रोल जुन्या नोटांनी घेऊ शकता"
"खते 500 च्या जुन्या नोटांनी घेऊ शकता"
"पेट्रोल पंपावर नोटा काढून घ्या"
"बिग बझार मधून नोटा काढून घ्या" -
सगळं करून बघतो शिवाजी, पण काळा पैसा काही जमा होईना.
८) शिवाजी म्हणतो,"50% दंड भरा आणि काळा पैसा पांढरा करून घ्या" -
जनता विचारात पडते, "हेच करायचं होतं तर नोटा बंद का केल्या?"
(Ssssssssh ... शिवाजीला असे प्रश्न विचारायचे नसतात)
९) शिवाजी म्हणतो,"जन-धन मधले फक्त 10000 प्रति महिना काढू शकता" -
जनता परत विचारात, "जर पैसा आमचा तर तू त्या अकाउंट चा मालक कसा झालास ठरवायला की किती पैसा त्यातून काढायचा ते?"
१०) शिवाजीला म्हणतो, "50 तोळ्यांपेक्षा जास्त सोने बायकांकडे दिसले तर प्रश्न विचारणार" -
समस्त दक्षिण भारतीय जनता आणि महाराष्ट्रातील आगरी समाज विचार करतो कि "इतकं कमी सोनं तर आमच्यातला भिकारी पण ठेवत नाही!"
शिवाजीला रोज पैशाशी संबधित नवनवीन ज्ञान मिळत जाते ( तसे ते ज्ञान सामान्य माणसाला खूप आधी पासून माहित आहेत कारण त्या common sense ने कळतात. पण शिवाजी, शिवाजीचे मंत्रिमंडळ आणि भाट असलेला मिडिया यांना कुठे common sense शी घेणे-देणे आहे?)..... आणि मग त्या नवीन कळलेल्या ज्ञानानुसार शिवाजी अजून काहीतरी अतार्किक म्हणतो आणि मीडिया शिवाजीच्या अफाट ज्ञानाची, प्रशासन कौशल्याची तारीफ करत बसतो.
मज्जा येतेय ना "शिवाजी म्हणतो" खेळायला??? जोवर आपल्या घरात कुणाचा जीव जात नाही तोवर नक्कीच मज्जा येते दुसऱ्यांचे हाल बघायला, जसे शिवाजी बघून जपान मध्ये हसून दाखवत होता !!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( ०२ डिसेंबर २०१६, ०७.३८ )
खेळातला शिवाजी हा त्या खेळातील बाकीच्या मुलांना काहीही अनिर्बंध, अतार्किक आदेश एकामागून एक देत असतो आणि बाकीची मुले खेळ किंवा मज्जा म्हणून तो आदेश स्विकार करत असतात, शिवाजीला काहीही प्रश्न न विचारता, विरोध न करता.
आपला देश आजकाल या "शिवाजी म्हणतो" खेळासारखा झालाय. आणि आमच्या 'शिवाजी' च्या काही क्रांतिकारी कल्पना आणि त्यांचे निर्वाहन एकामागून एक असे झाले -
१) शिवाजी म्हणतो, "भारतातल्या सगळ्या लोकांना 'जन-धन' बँक अकाऊंट काढून द्या" -
समस्त सरकारी बँकाचे कर्मचारी सगळी कामे सोडून 22 कोटी अकाउंट उघडतात, कसलेही कागदपत्र पडताळणी न करता. एका अकाउंट मध्ये सरासरी रक्कम 1700. त्यातली बहुतांश अकाउंट शून्य पैसे जमा दाखवतात.
२) शिवाजी म्हणतो, "बँकांनी शून्य जमा असणाऱ्या 'जन-धन' अकाउंट मध्ये काही रक्कम जमा करावी" -
झाला ना Zero balance वाल्या अकाउंट चा डाग दूर?
३) शिवाजी म्हणतो, "60% दंड भरून काळा पैसा पांढरा करून घ्या" -
अवघे 4000 कोटी जमा होतात.
४) शिवाजी म्हणतो, "45% दंड भरून काळा पैसा पांढरा करून घ्या" -
64000 कोटी जमा होतात, पण शिवाजीने तर लाखो कोटी कोटी रुपये काळा पैसा असल्याचे भाकीत केलेलं असते!
५) थोडासा वैतागून शिवाजी म्हणतो, "500 आणि 1000 च्या नोटा बाद करा, आणि 500, 2000 च्या नव्या नोटा चलनात आणा. बघा काळा पैसा ठेवणारे कसे मरतात ते!" -
प्रत्यक्षात फक्त सामान्य लोकच मरायला लागतात ATM, बँके समोरच्या रांगेत, इस्पितळात आणि पैसा नाही म्हणून काम-धंदा ठप्प झाल्याने. एकही काळा पैसा वाला काही मरत नाही की एकालाही वेड लागत नाही. आणि नवीन नोटांचे प्रश्न तर अजून वेगळेच, त्या मिळतही नाहीत आणि मिळालेल्या खऱ्या की खोट्या त्या पण कळत नाहीत.
६) मग शिवाजी थोडा रडून दाखवतो आणि म्हणतो, "मी तुमच्यासाठी घर, परिवार सोडलंय. मला फक्त 50 दिवस द्या" -
जनताही भारावून जाते मग.
७) नंतर शिवाजी थोडा वेडा होतो आणि एकामागून एक उलटसुलट आज्ञा रोज द्यायला लागतो.
"4000 रुपये रोज बदलून घेऊ शकता"
"4500 रुपये रोज बदलून घेऊ शकता"
"2000 रुपये रोज बदलून घेऊ शकता"
"हॉस्पिटल, रेल्वे, पेट्रोल जुन्या नोटांनी घेऊ शकता"
"खते 500 च्या जुन्या नोटांनी घेऊ शकता"
"पेट्रोल पंपावर नोटा काढून घ्या"
"बिग बझार मधून नोटा काढून घ्या" -
सगळं करून बघतो शिवाजी, पण काळा पैसा काही जमा होईना.
८) शिवाजी म्हणतो,"50% दंड भरा आणि काळा पैसा पांढरा करून घ्या" -
जनता विचारात पडते, "हेच करायचं होतं तर नोटा बंद का केल्या?"
(Ssssssssh ... शिवाजीला असे प्रश्न विचारायचे नसतात)
९) शिवाजी म्हणतो,"जन-धन मधले फक्त 10000 प्रति महिना काढू शकता" -
जनता परत विचारात, "जर पैसा आमचा तर तू त्या अकाउंट चा मालक कसा झालास ठरवायला की किती पैसा त्यातून काढायचा ते?"
१०) शिवाजीला म्हणतो, "50 तोळ्यांपेक्षा जास्त सोने बायकांकडे दिसले तर प्रश्न विचारणार" -
समस्त दक्षिण भारतीय जनता आणि महाराष्ट्रातील आगरी समाज विचार करतो कि "इतकं कमी सोनं तर आमच्यातला भिकारी पण ठेवत नाही!"
शिवाजीला रोज पैशाशी संबधित नवनवीन ज्ञान मिळत जाते ( तसे ते ज्ञान सामान्य माणसाला खूप आधी पासून माहित आहेत कारण त्या common sense ने कळतात. पण शिवाजी, शिवाजीचे मंत्रिमंडळ आणि भाट असलेला मिडिया यांना कुठे common sense शी घेणे-देणे आहे?)..... आणि मग त्या नवीन कळलेल्या ज्ञानानुसार शिवाजी अजून काहीतरी अतार्किक म्हणतो आणि मीडिया शिवाजीच्या अफाट ज्ञानाची, प्रशासन कौशल्याची तारीफ करत बसतो.
मज्जा येतेय ना "शिवाजी म्हणतो" खेळायला??? जोवर आपल्या घरात कुणाचा जीव जात नाही तोवर नक्कीच मज्जा येते दुसऱ्यांचे हाल बघायला, जसे शिवाजी बघून जपान मध्ये हसून दाखवत होता !!
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( ०२ डिसेंबर २०१६, ०७.३८ )
No comments:
Post a Comment