Thursday, January 5, 2017

युरोप आणि भारत

आम्ही युरोपच्या किमान 300 वर्षे मागे आहोत... जेव्हा आमच्याकडे जमिनीच्या तुकड्यांसाठी लोक तलवारी घेऊन भांडत होते तेव्हा न्यूटनबाबा एखादी गोष्ट पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर कशी जाऊ शकेल याच्या विचारात होता. जेव्हा गायी आणि डुकराच्या मांसावरून आम्ही धार्मिक भावनांनी उत्तेजित होत होतो, तेव्हा Voltaire लोकशाहीच्या व्याख्या मांडत होता.

आजही प्रत्येक जातीच्या/धर्मांच्या संघटनांची नावे आणि चिन्हे पाहा.... सगळ्यात सिंह, वाघ, पँथर, कोब्रा, बिबट्या असलीच हिंस्त्र श्वापदे दिसतील. सगळ्या जाती/धर्माचे जाज्वल्य अभिमान बघा.... कुठला तरी लढाईखोर राजा किंवा एका जातीने दुसऱ्या जातीला हरवल्याची थोरवी सांगणाऱ्या फालतू लढाया. एकुणात काय, तर अखंड हिंसेला प्रोत्साहन.

युरोपने सुदधा 2 महायुद्धे पाहिली, 2 पिढ्या मेलेल्या पाहिल्या. पण लगेच धडा घेत त्यांनी स्वतःच्या खंडात शांतता निर्माण केली. दुर्दैवाने भारतात अशी काही मोठी युद्धजन्य स्थिती कधी आली नाही की अख्खी पिढी मरावी.... तसे काही झाले असते तर कदाचित या देशाला शांतीची, प्रगतीची आणि मानवी आयुष्याची किंमत कळाली असती.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २० ऑक्टोबर २०१६, २२.०४ )

No comments:

Post a Comment