Thursday, January 5, 2017

तथाकथित आंबेडकरवाद्यांनो...

आंबेडकरांचे साहित्य महारांनी/नवबौद्धांनी वेदांच्या जोडीला नेऊन ठेवलंय... चिकित्सा करायची नाही की एकाही वाक्याबद्दल प्रश्न, वेगळा विचार मांडायचा नाही. चुकून कुणी असा प्रयत्न केलाच तर शिव्यांची लाखोली!!

महार/नवबौध्द हे दलितांमधले उच्चवर्णीय वंशवादी, सनातनी झालेत, आणि आंबेडकरांच्या विचारांची त्यांनी पोथी करून टाकलीय. ब्राह्मणांनी टाकून द्यायला सुरुवात केलेले ब्राम्हण्य महारांनी अंगिकारायला सुरुवात केलीय.

स्वतः लिहिलेली राज्यघटना जर निष्प्रभ ठरली तर ती सर्वप्रथम जाळायची तयारी डॉ.आंबेडकरांनी जाहीरपणे संसदेत बोलून दाखवली होती. बुद्धाने "अप्प दीप भव" म्हणत माणसाने स्वतःच्या प्रज्ञेला जागृत करायला सांगितले, स्वतःची वाट शोधायला सांगितले. पण बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणाऱ्या समाजातील तथाकथित विचारवंत, नेते आणि तरुणांची नवी पिढी ही पोथीवादाने बरबटलेली आहे.

50 गटांत फुटलेला, एकही आमदार निवडून आणण्यास नालायक ठरलेला, एका जातीपुरता संकुचित राहिलेला रिपब्लिकन पक्ष ही महार/नवबौध्द समाजाच्या अहंकाराची आणि वैचारिक/राजकीय मूर्खपणाची पावती आहे.
महारांनी/नवबौद्धांनी बौद्ध धर्माचे एका जातीपूरते डबके केलेय, आणि त्यात आता आंबेडकरांच्या विचारांची पोथी करून बुडवून टाकलीय.

तथाकथित आंबेडकरवाद्यांनो, तुम्ही मला कितीही शिव्या द्या... त्याने मला फरक पडत नाही, उलट तुमची लायकी दिसते. पण तुमच्या असल्या वागण्याने तुमची अधोगती काही थांबणार नाहीये.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २९ ऑक्टोबर २०१६, १२.५७ )

No comments:

Post a Comment