कुठल्याही फालतू प्रसिद्धी आणि लोकप्रियतेची मला गरज कधीही नव्हती आणि
नसेल. हे सांगायची खरं तर गरज नव्हती पण काही विद्वान स्त्री-पुरुषांनी असा
काही प्रचार केला की मी मोठेपणाची हाव आहे म्हणून हे करतोय. मला कुठल्या
पक्षाच्या स्टेजवर बसायचं नव्हतं आणि कुठल्या मेळाव्यात-व्याख्यानमालेत
व्याख्यान द्यायचंही नव्हतं. आधी फक्त मेडिकल कॉलेजचे आणि IIM चे मिळून
1800 मित्र होते, ते मध्यंतरी 4200 वर गेले, त्यातून कमी करून काही 4000
राहिले असतील आता. आणि अजून बरोबर 500 pending friend request आहेत. 995 का
काही follower आहेत. खूप मोठा पसारा खूप थोड्या काळात झाला जो मी कधीही
इच्छिला नव्हता. आणि हा सगळा पसारा टाकून जाताना मला काहीही वाईट वाटत
नाहीये.
मी जे काही लिहिलं ते स्वतःशी प्रामाणिक राहून आणि कुणाच्या एका पैशाच्या मिंध्यात न राहता. पण या समाजात फक्त माणूस मेला की मगच त्याचे गोडवे गायची परंपरा आहे त्यामुळे जिवंतपणी प्रामाणिक आणि सरळ लोकांना फक्त त्रासच असणार आहे. झुंडीपुढे कुणाचाही आजवर टिकाव लागलेला नाहीये कारण झुंडीला अक्कल नसते मग ती झुंड कुणाचीही असो. आणि जर माणसाने खूप प्रामाणिकपणे काही खरं बोललं, लिहिलं की ते समाजातील कुणा न कुणाच्या भावनांवर आघात करणारच! त्यामुळे मी सगळ्यांच्या bad books मध्ये जाणे स्वाभाविक होते, जे मला अपेक्षित पण होते.
वाईट फक्त एकाच गोष्टीचे वाटले की या समाजात एकही विचारप्रवाह वैचारिकरित्या प्रामाणिक राहिला नाहीये. सगळीकडे कंपूबाजी आणि वैयक्तिक हितसंबंध इतके खोलवर रुजलेत की त्या हितसंबंधांना, कंपूच्या हितांना अडथळा आला की मग खूप सालस मुखवट्या मागच्या विखारी वृत्ती बाहेर येऊन रंग दाखवायला लागतात. ज्यांना मी खूप जवळचे मित्र आणि आदर्शवत असे काही समजत होतो त्यांनी पण आपापले खरे चेहरे वेळोवेळी दाखवून दिले. आणि सगळ्या प्रकारच्या लोकांचा अनुभव घेऊन सांगतोय, की इथल्या समस्त विचारधारा आणि त्यांना वागवणारी लोक दांभिक आणि खोटारडी आहेत. सगळ्यांचे काही स्वार्थ आहेत आणि त्या वैयक्तिक स्वार्थाशी मात्र सगळे प्रामाणिक आहेत.
मला या विचारधारा, हा लोकांचा/मतांचा गलबला आणि त्यातून येणारे त्रास आता नकोयत. कुणी कितीही उर बडवून स्वतःचा अथवा स्वतःच्या विचारधारेचा मोठेपणा सांगितला तरी एक गोष्ट भारतासाठी त्रिवार सत्य आहे ती अशी की "हा देश किर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही". आयुष्यात आईबापांच्या समाजसेवेच्या संस्कारांनी खूप मोठे नुकसान नेहमी केलेय माझे. त्यांनी आमच्या संबंध लहानपणात आम्हाला कमी लक्ष देऊन दुसऱ्याच्या मुलांना शिक्षणात मदत केली. मीही कधीही स्वतःचा, स्वतःच्या career चा किंवा कुटुंबाचा विचार केला नाही आणि तिथे मी चुकलोय. स्वतःच्या मुलाचा पहिला वाढदिवस सुद्धा मी अनाथाश्रमात साजरा केला. पण आज खरंच स्वतःच्या विचारांवर आणि आईवडिलांच्या संस्कारांवर माझे मन प्रश्न उभा करतेय.
Linked In वर management च्या गप्पा मारून स्वतःचे follower वाढवून मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करण्यापेक्षा मी फेसबुकवर समाजासाठी लिहिण्यात वेळ घालवत होतो. चुकलंच माझं जरा. इथे लिहिण्याचे ना पैसे मिळतात, ना काही त्याने घर चालतं, उलट लोकांचे शिव्याशाप आणि फालतू आरोप ऐकत बसा. त्यापेक्षा हाच वेळ दुसरीकडे वापरून आयुष्यात बरंच काही साधता येईल. नवीन पुस्तके वाचता येतील, पेंटिंग शिकायला परत सुरुवात करता येईल. स्वतःच्या कुटुंबासोबत weekend ला धमाल करता येईल. आणि हे करणे खरंच जास्त लाभदायी आहे. कारण हे मी नाही केलं तर लोकांसाठी त्रास घेण्यासाठी स्वतःच्या आयुष्याशी compromise करायची सवय कबीरला पण लागायची. माझ्या आईबापाने दिलेले प्रामाणिकपणाचे, निस्वार्थीपणाचे चुकीचे संस्कार मला आता पुढे सरकवायचे नाहीयेत. काळानुरूप जगायला माझ्या मुलाला तरी यायला हवं!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १० ऑक्टोबर २०१६, २२.५८ )
मी जे काही लिहिलं ते स्वतःशी प्रामाणिक राहून आणि कुणाच्या एका पैशाच्या मिंध्यात न राहता. पण या समाजात फक्त माणूस मेला की मगच त्याचे गोडवे गायची परंपरा आहे त्यामुळे जिवंतपणी प्रामाणिक आणि सरळ लोकांना फक्त त्रासच असणार आहे. झुंडीपुढे कुणाचाही आजवर टिकाव लागलेला नाहीये कारण झुंडीला अक्कल नसते मग ती झुंड कुणाचीही असो. आणि जर माणसाने खूप प्रामाणिकपणे काही खरं बोललं, लिहिलं की ते समाजातील कुणा न कुणाच्या भावनांवर आघात करणारच! त्यामुळे मी सगळ्यांच्या bad books मध्ये जाणे स्वाभाविक होते, जे मला अपेक्षित पण होते.
वाईट फक्त एकाच गोष्टीचे वाटले की या समाजात एकही विचारप्रवाह वैचारिकरित्या प्रामाणिक राहिला नाहीये. सगळीकडे कंपूबाजी आणि वैयक्तिक हितसंबंध इतके खोलवर रुजलेत की त्या हितसंबंधांना, कंपूच्या हितांना अडथळा आला की मग खूप सालस मुखवट्या मागच्या विखारी वृत्ती बाहेर येऊन रंग दाखवायला लागतात. ज्यांना मी खूप जवळचे मित्र आणि आदर्शवत असे काही समजत होतो त्यांनी पण आपापले खरे चेहरे वेळोवेळी दाखवून दिले. आणि सगळ्या प्रकारच्या लोकांचा अनुभव घेऊन सांगतोय, की इथल्या समस्त विचारधारा आणि त्यांना वागवणारी लोक दांभिक आणि खोटारडी आहेत. सगळ्यांचे काही स्वार्थ आहेत आणि त्या वैयक्तिक स्वार्थाशी मात्र सगळे प्रामाणिक आहेत.
मला या विचारधारा, हा लोकांचा/मतांचा गलबला आणि त्यातून येणारे त्रास आता नकोयत. कुणी कितीही उर बडवून स्वतःचा अथवा स्वतःच्या विचारधारेचा मोठेपणा सांगितला तरी एक गोष्ट भारतासाठी त्रिवार सत्य आहे ती अशी की "हा देश किर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही". आयुष्यात आईबापांच्या समाजसेवेच्या संस्कारांनी खूप मोठे नुकसान नेहमी केलेय माझे. त्यांनी आमच्या संबंध लहानपणात आम्हाला कमी लक्ष देऊन दुसऱ्याच्या मुलांना शिक्षणात मदत केली. मीही कधीही स्वतःचा, स्वतःच्या career चा किंवा कुटुंबाचा विचार केला नाही आणि तिथे मी चुकलोय. स्वतःच्या मुलाचा पहिला वाढदिवस सुद्धा मी अनाथाश्रमात साजरा केला. पण आज खरंच स्वतःच्या विचारांवर आणि आईवडिलांच्या संस्कारांवर माझे मन प्रश्न उभा करतेय.
Linked In वर management च्या गप्पा मारून स्वतःचे follower वाढवून मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करण्यापेक्षा मी फेसबुकवर समाजासाठी लिहिण्यात वेळ घालवत होतो. चुकलंच माझं जरा. इथे लिहिण्याचे ना पैसे मिळतात, ना काही त्याने घर चालतं, उलट लोकांचे शिव्याशाप आणि फालतू आरोप ऐकत बसा. त्यापेक्षा हाच वेळ दुसरीकडे वापरून आयुष्यात बरंच काही साधता येईल. नवीन पुस्तके वाचता येतील, पेंटिंग शिकायला परत सुरुवात करता येईल. स्वतःच्या कुटुंबासोबत weekend ला धमाल करता येईल. आणि हे करणे खरंच जास्त लाभदायी आहे. कारण हे मी नाही केलं तर लोकांसाठी त्रास घेण्यासाठी स्वतःच्या आयुष्याशी compromise करायची सवय कबीरला पण लागायची. माझ्या आईबापाने दिलेले प्रामाणिकपणाचे, निस्वार्थीपणाचे चुकीचे संस्कार मला आता पुढे सरकवायचे नाहीयेत. काळानुरूप जगायला माझ्या मुलाला तरी यायला हवं!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( १० ऑक्टोबर २०१६, २२.५८ )
No comments:
Post a Comment