Friday, January 6, 2017

चलनबदली व राष्ट्रवाद

बरं एरव्ही जगात कुठेही काही आपत्ती आली असता चड्डी घालून, काठ्या घेऊन येणारे ते लोक आता कुठे गेले अचानक??

गरीब लोकांचे हाल होतायत, वृद्ध रांगेत मरतायत, माता-भगिनी हतबल झाल्यात... आणि शेठ म्हणतायत फक्त 30 डिसेंबर पर्यंतच !!

चड्डीवाल्यांनो, लोकांना रांगेत उभे राहायला शिकवणाऱ्या राष्ट्रवाद्यांनो .... उघडा की एखादे गरिबांसाठीचे अन्नछत्र, द्या की डेबिट/क्रेडिट कार्डाने किराणा भरून गरीब माता-भगिनींना, करून दाखवा की हॉस्पिटल मध्ये ईलाज पैशाअभावी नाडल्या गेलेल्या लोकांचा!! 

आणि तो देशप्रेमाची भंकस मारणारा रामदेव, 10000 लोकांकडून तंबोरा वाजवून विश्वशांती आणणारा श्रीश्री.... ते कुठे उलथलेत? स्वतःच्या कंपन्यांचे पीठ, तेल, दूध, तूप काही फुकट द्या की म्हणावं आता लोकांना राष्ट्रप्रेमासाठी, विश्वशांतीसाठी!!!

- डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( १४ नोव्हेंबर २०१६, ०८.४३ )

No comments:

Post a Comment