नोटबंदीच्या समर्थनासाठी धूळफेक करणारा अजून एक लेख - http://www.marathipizza.com/the-refutation-of-manmohan-singh-by-s-gurumurthy/
आणि त्यावर माझे उत्तर -
1) रोजगार निर्मिती फक्त 27 लाख हा आकडा निराधार आहे. उलट UPA च्या काळात नरेगा अंतर्गत कितीतरी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली गेली.
2) UPA च्या काळात सोने आणि जमिनी महाग झाल्या याचे कारण लोकांच्या आर्थिक सुबत्तेत सुद्धा आहे. जर मुळात GDP वाढला तर per capita income वाढेल, त्याने dispensable income वाढेल आणि आपोआप सेवा व वस्तूंची मागणी वाढेल. त्यात अनैसर्गिक किंवा चुकीचे काहीही नाही.
आणि त्यावर माझे उत्तर -
1) रोजगार निर्मिती फक्त 27 लाख हा आकडा निराधार आहे. उलट UPA च्या काळात नरेगा अंतर्गत कितीतरी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली गेली.
2) UPA च्या काळात सोने आणि जमिनी महाग झाल्या याचे कारण लोकांच्या आर्थिक सुबत्तेत सुद्धा आहे. जर मुळात GDP वाढला तर per capita income वाढेल, त्याने dispensable income वाढेल आणि आपोआप सेवा व वस्तूंची मागणी वाढेल. त्यात अनैसर्गिक किंवा चुकीचे काहीही नाही.
3) बँकाकडून चलनपुरवठा वाढला किंवा FDI द्वारे पैसा देशात आला तर त्याने
economy मध्ये multiplier effect पाहायला मिळतो. असाच इफेक्ट UPA च्या
काळातही पाहायला मिळाला. त्यामुळे मागणी वाढून किंमती वाढणे स्वाभाविक आहे.
4) 1000 च्या नोटांपैकी 2/3 नोटा व 500 च्या नोटांपैकी 1/3 नोटा कधी चलनात आल्याच नाहीत हा RBI चा दावा मूर्खपणा आहे. भारतात कधीही नोटेचा सिरीयल नंबर पाहून ती किती हातांमधून फिरली हे कुठेही नोंदवले जात नाही. त्यामुळे हा दावा तर पूर्ण निराधार आहे.
5) मुद्दा क्र.4 मधील RBI चा दावा जर खरा मानला आणि त्यान्वये त्यांचे 6 लाख कोटी काळे पैसे आहेत हे गृहीतकही काही काळ खरे मानले तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंतच बदलून घेऊन उरलेले चलन हे 6 लाख कोटींपेक्षा कमी राहिलंय. आणि अजून 3 आठवड्यात उरलेलं चलनही बदलले जाईल. त्यामुळे काळा पैसा होता कुठे असाच प्रश्न 1 जानेवारी नंतर विचारावा लागेल.
कुणीही सामान्य बुद्धीचा माणूस सुद्धा हे सांगू शकेल की पैसा काळा असो किंवा पांढरा, तो चलनात फिरतो. कुणीही दीर्घकाळ उशीत किंवा गादीत भरून पैसे ठेवत नाही, भले तो काळा का असेना. आणि जर बाजारात सोने, जमीन आणि शेअर्स इतके चांगले रिटर्न देत असतील तर कुणीही पैसे पोत्यात भरून ठेवणार नाही.
शेअर च्या किंमती काळ्या पैशामुळे वाढल्या वगैरे अंदाज तर अगदी लोणकढी थाप आहे. शेअर्स मधली गुंतवणूक ही खूप checks मधून जाते, तिथे निनावी व्यवहार चालत नाहीत. आणि UPA च्या काळात शेअर्सच्या किंमती या बाजारातील मनमोहन सिंग यांच्या वरच्या विश्वासाने वाढलेल्या होत्या आणि त्यातही विशेषकरून परकीय गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे. 2009 ला मनमोहन परत निवडून आले त्या दिवशी निर्देशांक Upper Circuit वर गेला होता.
मोदी निवडून आले त्या दिवशीही निर्देशांक वधारला होता. आता याला काय म्हणणार?
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १५ डिसेंबर २०१६, २२.२९ )
4) 1000 च्या नोटांपैकी 2/3 नोटा व 500 च्या नोटांपैकी 1/3 नोटा कधी चलनात आल्याच नाहीत हा RBI चा दावा मूर्खपणा आहे. भारतात कधीही नोटेचा सिरीयल नंबर पाहून ती किती हातांमधून फिरली हे कुठेही नोंदवले जात नाही. त्यामुळे हा दावा तर पूर्ण निराधार आहे.
5) मुद्दा क्र.4 मधील RBI चा दावा जर खरा मानला आणि त्यान्वये त्यांचे 6 लाख कोटी काळे पैसे आहेत हे गृहीतकही काही काळ खरे मानले तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंतच बदलून घेऊन उरलेले चलन हे 6 लाख कोटींपेक्षा कमी राहिलंय. आणि अजून 3 आठवड्यात उरलेलं चलनही बदलले जाईल. त्यामुळे काळा पैसा होता कुठे असाच प्रश्न 1 जानेवारी नंतर विचारावा लागेल.
कुणीही सामान्य बुद्धीचा माणूस सुद्धा हे सांगू शकेल की पैसा काळा असो किंवा पांढरा, तो चलनात फिरतो. कुणीही दीर्घकाळ उशीत किंवा गादीत भरून पैसे ठेवत नाही, भले तो काळा का असेना. आणि जर बाजारात सोने, जमीन आणि शेअर्स इतके चांगले रिटर्न देत असतील तर कुणीही पैसे पोत्यात भरून ठेवणार नाही.
शेअर च्या किंमती काळ्या पैशामुळे वाढल्या वगैरे अंदाज तर अगदी लोणकढी थाप आहे. शेअर्स मधली गुंतवणूक ही खूप checks मधून जाते, तिथे निनावी व्यवहार चालत नाहीत. आणि UPA च्या काळात शेअर्सच्या किंमती या बाजारातील मनमोहन सिंग यांच्या वरच्या विश्वासाने वाढलेल्या होत्या आणि त्यातही विशेषकरून परकीय गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे. 2009 ला मनमोहन परत निवडून आले त्या दिवशी निर्देशांक Upper Circuit वर गेला होता.
मोदी निवडून आले त्या दिवशीही निर्देशांक वधारला होता. आता याला काय म्हणणार?
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १५ डिसेंबर २०१६, २२.२९ )
No comments:
Post a Comment