4 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी
मीडियाने एका राजकीय नेत्याच्या नैसर्गिक मृत्यूनंतर मराठी लोकांना
भावनेच्या पुरात वाहवले होते. पालघरच्या एका मुलीेने त्याबद्दल एक साधे
स्टेटस टाकले होते, आणि तिच्या मैत्रिणीने त्याला like केले. त्यानंतर त्या
मुलींविरुद्ध पोलीस तक्रार केली गेली, त्या मुलीच्या काकांचे हॉस्पिटल
जमावाने तोडफोड करून लाखोंचे नुकसान केले. पोलिसांनी दोन्ही मुलींना चक्क
अटक करून ताब्यात घेतले. त्या दोन्ही मुलींचे पालक, नातेवाईक अगदी जिवाच्या
भीतीने गांगरून गेले होते. पोलिसांच्या
या कारवाईला सरकारचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. पण मीडिया मधील काही
अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सर्वोच्च मानणाऱ्या पत्रकार लोकांनी या दोन्ही
मुलींची बाजू उचलून धरली होती.
ज्यावेळी त्या 2 मुलींनी त्यांचा साधा प्रश्न विचारला होता, त्यावेळेस मी खालचे स्टेटस लिहिले होते. माझे स्टेटस त्या मुलीच्या स्टेटस च्या मानाने जरा जास्तच बेधडक होते. आणि त्या दोन मुलींच्या अटकेनंतर त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कासाठी बोलणाऱ्या मोजक्या लोकांत मीही होतो. त्या दोन्ही मुलींना माझ्या IIM Ahmedabad मधल्या एका प्रोफेसरांनी IIM मध्ये आमंत्रित केले, त्याच्या आयोजनात मी प्रोफेसरांचा सहाय्यक होतो. आम्ही आधी एक classroom बुक केली होती, पण नंतर कार्यक्रमाचे स्वरूप कळाल्यावर IIM च्या प्रशासनाने ती क्लासरूम देणे रद्द केले. दोन मुलींपैकी एका मुलीचे कुटुंबीय प्रोफेसरांच्या घरी उतरलेले आणि दुसरीचे कुटुंबीय माझ्या घरी.
IIM सारख्या स्वतंत्र संस्थेतसुद्धा 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या विषयावर पालघरच्या दोन्ही मुलींची बाजू समजून घ्यायला क्लासरूम न मिळणे हे धक्कादायक होते. पण प्रोफेसरही मागे हटणार नव्हते, त्यांनी तोच कार्यक्रम त्यांच्या कॅम्पसमधील बंगल्याच्या बागेत आयोजित केला. एकूण 3-4 प्रोफेसर आणि 25 स्वतंत्र विचाराचे विद्यार्थी एवढ्या छोट्याशा लोकसमूहापुढे त्या मुलींनी त्यांना त्या प्रकरणात काय काय भोगावे लागले ते पाणावल्या डोळ्यांनी सांगितले. सबंध समाज विरोधात असताना आम्ही तीस एक लोक आणि मिडिया मधले काही पत्रकार एवढेच पाठबळ त्या मुलींना एक नवी ऊर्जा देऊन गेले. 2-3 दिवसांच्या त्यांच्या मुक्कामात त्यांच्याशी छान मैत्री झाली आणि ती आजही टिकून आहे.
अगदी सामान्य घरातल्या, सामान्य मुलींनी एक साधे मत व्यक्त करणे या देशातील व्यक्तिपूजक राजकारण्यांना, पोलिसांना आणि समाजकंटकांना अजिबात मानवले नव्हते. त्यांनी त्यांचे उपद्रवमूल्य दाखवून दिले होते. त्याचवेळी माझे प्रोफेसर गुप्ता, बरखा दत्त सारखे काही पत्रकार आणि माझ्यासारखे मूठभर विद्यार्थी या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी बोलत होतो, समाजाच्या विरोधाची पर्वा न करता. मलाही माझ्या वडिलांनी हे खालील स्टेटस लिहिल्यावर फोन करून सांगितले होते की मी काहीही लिहू नये. पण, मी माझ्या वडिलांचे तेव्हाही ऐकले नव्हते.
4 वर्षांनंतर आजही मी तसाच आहे. खरे बोलायला, स्वतःचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगायला मी आजही तेवढाच निर्भय आहे. स्वतःचा आवाज हरवून, विचार हरवून जगण्याला जगणे म्हणत नाहीत. भारतीय संविधानाने दिलेले 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी लढायला मी कधीही तयार आहे, मग भले तो आवाज माझ्या मतांविरोधी असणाराचा का असेना.
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १७ नोव्हेंबर २०१६, २२.१५ )
ज्यावेळी त्या 2 मुलींनी त्यांचा साधा प्रश्न विचारला होता, त्यावेळेस मी खालचे स्टेटस लिहिले होते. माझे स्टेटस त्या मुलीच्या स्टेटस च्या मानाने जरा जास्तच बेधडक होते. आणि त्या दोन मुलींच्या अटकेनंतर त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कासाठी बोलणाऱ्या मोजक्या लोकांत मीही होतो. त्या दोन्ही मुलींना माझ्या IIM Ahmedabad मधल्या एका प्रोफेसरांनी IIM मध्ये आमंत्रित केले, त्याच्या आयोजनात मी प्रोफेसरांचा सहाय्यक होतो. आम्ही आधी एक classroom बुक केली होती, पण नंतर कार्यक्रमाचे स्वरूप कळाल्यावर IIM च्या प्रशासनाने ती क्लासरूम देणे रद्द केले. दोन मुलींपैकी एका मुलीचे कुटुंबीय प्रोफेसरांच्या घरी उतरलेले आणि दुसरीचे कुटुंबीय माझ्या घरी.
IIM सारख्या स्वतंत्र संस्थेतसुद्धा 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' या विषयावर पालघरच्या दोन्ही मुलींची बाजू समजून घ्यायला क्लासरूम न मिळणे हे धक्कादायक होते. पण प्रोफेसरही मागे हटणार नव्हते, त्यांनी तोच कार्यक्रम त्यांच्या कॅम्पसमधील बंगल्याच्या बागेत आयोजित केला. एकूण 3-4 प्रोफेसर आणि 25 स्वतंत्र विचाराचे विद्यार्थी एवढ्या छोट्याशा लोकसमूहापुढे त्या मुलींनी त्यांना त्या प्रकरणात काय काय भोगावे लागले ते पाणावल्या डोळ्यांनी सांगितले. सबंध समाज विरोधात असताना आम्ही तीस एक लोक आणि मिडिया मधले काही पत्रकार एवढेच पाठबळ त्या मुलींना एक नवी ऊर्जा देऊन गेले. 2-3 दिवसांच्या त्यांच्या मुक्कामात त्यांच्याशी छान मैत्री झाली आणि ती आजही टिकून आहे.
अगदी सामान्य घरातल्या, सामान्य मुलींनी एक साधे मत व्यक्त करणे या देशातील व्यक्तिपूजक राजकारण्यांना, पोलिसांना आणि समाजकंटकांना अजिबात मानवले नव्हते. त्यांनी त्यांचे उपद्रवमूल्य दाखवून दिले होते. त्याचवेळी माझे प्रोफेसर गुप्ता, बरखा दत्त सारखे काही पत्रकार आणि माझ्यासारखे मूठभर विद्यार्थी या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी बोलत होतो, समाजाच्या विरोधाची पर्वा न करता. मलाही माझ्या वडिलांनी हे खालील स्टेटस लिहिल्यावर फोन करून सांगितले होते की मी काहीही लिहू नये. पण, मी माझ्या वडिलांचे तेव्हाही ऐकले नव्हते.
4 वर्षांनंतर आजही मी तसाच आहे. खरे बोलायला, स्वतःचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगायला मी आजही तेवढाच निर्भय आहे. स्वतःचा आवाज हरवून, विचार हरवून जगण्याला जगणे म्हणत नाहीत. भारतीय संविधानाने दिलेले 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी लढायला मी कधीही तयार आहे, मग भले तो आवाज माझ्या मतांविरोधी असणाराचा का असेना.
- डॉ. विनय काटे
फेसबुक पोस्ट ( १७ नोव्हेंबर २०१६, २२.१५ )
No comments:
Post a Comment