काल एका जर्मन राज्याने आयोजित केलेल्या business conference ला गेलो
होतो. राज्याचे उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई नी जर्मन कंपन्यांपुढे
महाराष्ट्राचे गुणगान करताना सांगितले की "महाराष्ट्रात हजारेक इंजिनिअरिंग
कॉलेज आहेत आणि वर्षाला 1 लाख इंजिनिअर बाहेर पडतात."
त्या जर्मन शिस्तमंडळाला सांगू वाटत होतं की "बाबांनो, तुम्ही समजता तशी भव्य कॉलेजेस नाहीयेत ही. 2-4 खोल्याच्या घरात पण इंजिनिअरिंग कॉलेज निघत या राज्यात आणि लाखामधल्या चाळीस हजार सीट तर रिकाम्या राहतात. बाकी शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची employ-ability इतकी महान आहे की unskilled labour इतका पगार देतात कंपन्या या मुलांना!"
पण सांगणार कसं? ते जर्मन शिष्टमंडळ बसलं होतं प्रत्येकाला दिलेली पुणेरी पगडी न्याहाळत आणि गळ्यात घातलेली 5 रुपयांची झेंडूची माळ सावरत!
बाकी अशी झेंडूची माळ बळी द्यायच्या आधी बकऱ्याला का घालतात ते काल व्यवस्थित कळले
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २४ सप्टेंबर २०१६, १४.४२ )
त्या जर्मन शिस्तमंडळाला सांगू वाटत होतं की "बाबांनो, तुम्ही समजता तशी भव्य कॉलेजेस नाहीयेत ही. 2-4 खोल्याच्या घरात पण इंजिनिअरिंग कॉलेज निघत या राज्यात आणि लाखामधल्या चाळीस हजार सीट तर रिकाम्या राहतात. बाकी शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची employ-ability इतकी महान आहे की unskilled labour इतका पगार देतात कंपन्या या मुलांना!"
पण सांगणार कसं? ते जर्मन शिष्टमंडळ बसलं होतं प्रत्येकाला दिलेली पुणेरी पगडी न्याहाळत आणि गळ्यात घातलेली 5 रुपयांची झेंडूची माळ सावरत!
बाकी अशी झेंडूची माळ बळी द्यायच्या आधी बकऱ्याला का घालतात ते काल व्यवस्थित कळले

डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २४ सप्टेंबर २०१६, १४.४२ )
No comments:
Post a Comment