लवकरच कांशीराम यांची घोषणा खरी व्हायची शक्यता आहे -
"जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी"
मला यात काही गैरही वाटत नाही कारण मेरिट नावाची काही गोष्ट नसते. लहानपणा पासून मिळणारे वातावरण आणि रिसोर्सेस ठरवतात की जन्माला आलेल्या माणसाला काय कौशल्य मिळेल आणि त्याची गुणवत्ता आणि भविष्य कुठल्या दिशेने जाईल.
"जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी"
मला यात काही गैरही वाटत नाही कारण मेरिट नावाची काही गोष्ट नसते. लहानपणा पासून मिळणारे वातावरण आणि रिसोर्सेस ठरवतात की जन्माला आलेल्या माणसाला काय कौशल्य मिळेल आणि त्याची गुणवत्ता आणि भविष्य कुठल्या दिशेने जाईल.
पण ही घोषणा खरी झाली तरी त्याने खूप काही नुकसान किंवा फायदा कुणालाही होणार नाहीये. सरकारी नोकऱ्या राहिल्याच कितीशा आता?
तेव्हा समस्त जाती-पोटजाती, धर्मांनी आपआपले जंगी मोर्चे काढावेत, आपले शक्तिप्रदर्शन करावे. त्याने थोडा काळ सगळ्यांच मनोरंजन आणि स्वतःची फसवणूक होईल.
इतर जगाप्रमाणे भारत हा सुद्धा knowledge economy होतोय. कुठलंही आरक्षण कुठल्याही समाजाला फार काळ तारू शकणार नाहीये. जे शिकतील, बुद्धीचा वापर करुन बदलणाऱ्या जगानुरूप स्वतःचे कौशल्य वृद्धिंगत करतील तेच या जगात टिकतील. बाकीचे संख्येने आणि शारीरिक ताकदीने कितीही मोठे असले तरी डायनोसॉर सारखे अस्त पावतील.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २७ सप्टेंबर २०१६, २०.५१ )
तेव्हा समस्त जाती-पोटजाती, धर्मांनी आपआपले जंगी मोर्चे काढावेत, आपले शक्तिप्रदर्शन करावे. त्याने थोडा काळ सगळ्यांच मनोरंजन आणि स्वतःची फसवणूक होईल.
इतर जगाप्रमाणे भारत हा सुद्धा knowledge economy होतोय. कुठलंही आरक्षण कुठल्याही समाजाला फार काळ तारू शकणार नाहीये. जे शिकतील, बुद्धीचा वापर करुन बदलणाऱ्या जगानुरूप स्वतःचे कौशल्य वृद्धिंगत करतील तेच या जगात टिकतील. बाकीचे संख्येने आणि शारीरिक ताकदीने कितीही मोठे असले तरी डायनोसॉर सारखे अस्त पावतील.
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( २७ सप्टेंबर २०१६, २०.५१ )
No comments:
Post a Comment