काल एका मिटींग मध्ये एक कन्सल्टंट team building साठी इंजिनिअर लोकांचे
मोठेपण थोडक्यात सांगत होता. आधीच्या कंपनीत Business Development आणि
Strategy मधल्या लोकांचे मोठेपण ऐकत होतो. IIM मध्ये MBA झालेल्या आधीच्या
बॅचच्या विद्यार्थ्यांचे कौतुक ऐकत असे. आणि त्याआधी वैद्यकीय क्षेत्रात
असताना डॉक्टरांचे कौतुक ऐकत होतो. थोडक्यात भारतीय लोकांना motivate आणि
engage करण्यासाठी तुम्ही काही तरी वेगळे आणि महान आहात हे सांगितल्याशिवाय
पर्याय नाही. आणि जरा जास्तच एकता हवी असेल तर मग दुसऱ्या प्रकारची लोक कसे आयत्या पिठावर रेघोट्या मारतायत वगैरे प्रस्तावना पण द्यावी लागते.
हे सांगायचे वेगळेपण कधी व्यवसाय-शिक्षणावर असते, तर कधी राष्ट्रीय,
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि भौगोलिक पण असते. एकाच वेळी एक माणूस अशा
असंख्य वेगळ्या गटांमध्ये स्वतःला गणत identity crisis मध्ये अडकतो,
दुसऱ्या लोकांबद्दल वेगवेगळे ग्रह बनवतो आणि उगीचच एका कलुषित दृष्टीने जग
बघायला लागतो. शिक्षण असो की व्यवसाय, किमान मला तरी या identity नको
वाटतात, म्हणून मी कधीही IIM च्या alumni meet ला गेलो नाहीये कि मेडिकल
कॉलेजला परत परत भेट दिली नाहीये. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांनी किंवा
कुठल्याही राजकीय-धार्मिक भावनांनी माझे रक्त पेटत नाही.
मला पुढे पाहायला आवडते, वर्तमानात जगून एक चांगले भविष्य घडवायला आवडते, माझ्यासाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी.
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया,
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया !
- फेसबुक पोस्ट ( १५ सप्टेंबर २०१६, १३.५८ )
मला पुढे पाहायला आवडते, वर्तमानात जगून एक चांगले भविष्य घडवायला आवडते, माझ्यासाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी.
जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया,
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया !
- फेसबुक पोस्ट ( १५ सप्टेंबर २०१६, १३.५८ )
No comments:
Post a Comment