आजच्या नमोजींच्या जाहिरातीनुसार.... Jio यायच्या आधी India digital नव्हता बरं का! किती त्रास व्हायचा लोकांना पेनाने पत्रे खरडायला, पोष्टमन ती गहाळ करत, टाईपरायटर चा खडखडाट, बँकेत पैसे भरायला आणि काढायला लांबच लांब रांगा, अँटेनाच्या काड्या जुळवून दिशा बदलत tv सिग्नल शोधणारी पोरे आणि टेलिफोनच्या डायल फिरवत "मोरे पिया गये रंगून" म्हणणाऱ्या गरीब बायका... किती किती दारुण चित्र हे देशाचं ???
'इंडिया डिजिटल व्हावा' हे सर्वप्रथम नमोजींना वाटले आणि तो एकच ध्यास घेत त्यांनी जग पालथे घातले विमानातून. 36 एक देश धुंडाळून पण उपाय मिळेना. नमोजींच्या या कासावीस करणाऱ्या स्वप्नाला पुरे करण्यासाठी मग मुकेशभाई पुढे सरसावले. त्यांनी 'दुनिया मुठ्ठीमें' आधीच केली होती, मग लागलीच त्याच दुनियेतल्या China नावाच्या एका देशातून त्यांनी 'Make in India' अंतर्गत फोन, wifi router आणून त्यावर Jio सुरु केले आणि नमोजींच्या Jioत jio आला.
पाहता पाहता चमत्कार झाला. देशात email आले, फेसबुक आले, ATM आली, internet banking आले, digital tv आणि set top box आले. साऱ्या देशात digital होण्याचे वारे वाहायला लागले. नमोजी भरून पावले, त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मग लागलीच त्यांनी Jio च्या logo चा रंग असणारे जाकीट घालून एक हसतमुख फोटो दिला आणि पानभर जाहिराती सगळ्या मुखपृष्ठावर सगळ्या पेपरात छापून आणल्या मुकेशभाईंनी.
तर भाऊ, आता आपण digital युगात प्रवेश केलाय बर का !! म्हणजे जसं मे 2014 आधी देशात रस्ते, विमाने, वीज, अन्न, पाणी नव्हते... अगदी तसंच सप्टेंबर 2016 आधी देशात लोक भूर्जपत्रावर, ताम्रपटावर लिहीत होते हा इतिहास आहे. कळलं की नाही?? आणि आज जे हे सगळे विकासाचे चित्र दिसतंय ते फक्त आपल्या विकासपुरुष नमोजींमुळे आहे. त्यांच्या आधी हा देश खूप मागास होता, लाज वाटण्याइतका (नमोजींच्या शब्दांत.... कुठले पाप केले म्हणून इथे जन्मलो?), पण नमोजी आणि मुकेशभाईनी त्यांच्या पुण्याईने आज खरे खुरे 'अच्छे दिन' आणलेत.
तेव्हा भाऊ, नतद्रष्टपणा सोड आणि 4G च्या सुपरफास्ट कनेक्शन वरून Twitter वर जाऊन मुकेशभाई आणि नमोजींना "जुग जुग Jio" असा आशिर्वाद दे... अगदी दिल से!
- डॉ. विनय काटे
(ताजा कलम: बाबा रामदेव नमोजींना गोमूत्र पिताना फोटो काढा म्हणून मागे लागल्याचे ऐकिवात आहे पतंजलीच्या जाहिरातीसाठी!)
- फेसबुक पोस्ट ( २सप्टेंबर २०१६, २०.१६ )
No comments:
Post a Comment